शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शेतकऱ्यांची बाजारात गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 00:05 IST

पाऊस पडताच सुरु झाली पेरणीची लगबग!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत दोन-तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे परिसरात पेरणीची लगबग सुरु झाली असून, बाजारात खत व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला होता. पावसाळा लवकर सुरु होईल, असे वाटल्याने शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे घाई-घाईत उरकून घेतली; परंतु त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारली. त्यामुळे एक-दोन पावसावर पेरणी करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अनेकांच्या पेरण्या उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती, तर उर्वरित शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शेतकरी पेरणीसाठी खत व बियाणे खरेदी करीत आहेत, तर अगोदरच पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, हे शेतकरी पिकांची फवारणी व अन्य पीक मशागतीची कामे उत्साहाने करीत आहेत, तर ज्यांची पेरणी करणे अद्याप बाकी आहे, त्यांनी पेरणीची तयारी चालविली आहे, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळलेली दिसून येते. काही शेतकरी अनेक दुकानात भाव विचारुन मगच खरेदी करतात.कृषी केंद्रधारकांचीच चालते मर्जीअनेक शेतकरी हे त्यांच्या विश्वातील कृषी केंद्रांवरच जावून खत व बियाणे खरेदी करीत आहेत. दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे नवीन वाणाचे बियाणे व खते ते खरेदी करताना दिसतात. अनेक दुकानदार शेतकऱ्यांना आपल्या मर्जीनुसार पटवून देत काही महागडे बियाणे खरेदी करण्यास बाध्य करीत असल्याचेही दिसून येते. सोयाबीनकडे वाढला शेतकऱ्यांचा कलयावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. मागिल वर्षी तूर या पिकाने शेतकऱ्यांना उत्पादन दिले; पण उत्पन्न नाही. त्यामुळे तुरीबाबत शेतकऱ्यांमध्ये काहीशी उदासीनता निर्माण झालेली आहे, तर पऱ्हाटी लागवडीचा खर्च व मेहनत जास्त असल्याने अनेक जण सोयाबीनला पसंती देताना दिसून येतात.