शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

शेतक-यांची विमा कंपनीकडे धाव

By admin | Updated: November 1, 2016 00:11 IST

पिकांचे नुकसान झालेले ९ हजारावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

खामगाव, दि. ३१- खरिप हंगामातील विविध पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविण्यासाठी शासनाने राज्यात विविध विमा कंपन्यांची निवड केली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे बुलडाणासह ११ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद व सोयाबिन या पिकांचे नुकसान झाले. तर परतीच्या पावसाने ज्वारी आणि सोयाबिन पिकाला फटका दिला आहे. परिणामी जिल्ह्यातील ९ हजार शेतकर्‍यांनी कृषी विभागासह रिलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीकडे पिक नुकसानीबाबत तक्रार दाखल केली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक २२५ शेतकर्‍यांनी विमा कंपनीकडे पिक विमा नुकसानीची तक्रार केली आहे. विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कंपनीने कृषी विभागाकडून माहिती मागविली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. कृषी विभागसुध्दा कंपनीकडून पंचनामे करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.