शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात ६० हजार कोटीचा किसान विमा घोटाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:50 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले.

जळगाव जामोद :  गेल्या पाच वर्षात भाजपा शासनाने महाराष्ट्रात जेवढे शासकीय दवाखाने, शाळा उघडल्या नसतील त्यापेक्षा जास्त पक्षाची कार्यालये उघडली. हे सरकार घोटाळेबाज असून यांनी महाराष्ट्रात ६० हजार कोटी रूपयांचा किसान विमा घोटाळा केला. विम्याचे नावावर एवढा प्रचंड पैसा शेतक-यांजवळून जमा केला तर केवळ ९ हजार कोटी विमा वाटला तर इतर पैसा गेला कोठे? असा सवाल काँग्रेसचे युवा नेते, हार्दिक पटेल यांनी केला. जळगाव जामोद येथे ५ सप्टेंबर रोजी भा.रा.काँ., रा.काँ., स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षाचेवतीने आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी रामविजय बुरूंगले, रा.काँ. सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्यासह काँग्रेसचे प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ, स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रंगराव देशमुख, डॉ.दलाल, मिना सातव तथा मतदार संघातील मान्यवरांची उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षात देशात ७० हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यांनी शेतक-यांना बरबाद केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी इतर युवा नेत्यांची सुद्धा भाषणे झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जातीपेक्षा विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतक-यांच्या तुरीचे हरभºयाचे अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. सभेला प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा