शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महाराष्ट्रात ६० हजार कोटीचा किसान विमा घोटाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:50 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले.

जळगाव जामोद :  गेल्या पाच वर्षात भाजपा शासनाने महाराष्ट्रात जेवढे शासकीय दवाखाने, शाळा उघडल्या नसतील त्यापेक्षा जास्त पक्षाची कार्यालये उघडली. हे सरकार घोटाळेबाज असून यांनी महाराष्ट्रात ६० हजार कोटी रूपयांचा किसान विमा घोटाळा केला. विम्याचे नावावर एवढा प्रचंड पैसा शेतक-यांजवळून जमा केला तर केवळ ९ हजार कोटी विमा वाटला तर इतर पैसा गेला कोठे? असा सवाल काँग्रेसचे युवा नेते, हार्दिक पटेल यांनी केला. जळगाव जामोद येथे ५ सप्टेंबर रोजी भा.रा.काँ., रा.काँ., स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षाचेवतीने आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी रामविजय बुरूंगले, रा.काँ. सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्यासह काँग्रेसचे प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ, स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रंगराव देशमुख, डॉ.दलाल, मिना सातव तथा मतदार संघातील मान्यवरांची उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षात देशात ७० हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यांनी शेतक-यांना बरबाद केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपविण्याचा घट घालणा-या या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही पटेल यांनी पुढे बोलतांना सांगितले. यावेळी इतर युवा नेत्यांची सुद्धा भाषणे झाली. यामध्ये अमोल मिटकरी यांनी जातीपेक्षा विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतक-यांच्या तुरीचे हरभºयाचे अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. सभेला प्रसेनजित पाटील, रमेशचंद्र घोलप, डॉ.स्वाती वाकेकर, ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा