शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शेतक-यांचा ओढा शेततळ्यांकडे !

By admin | Updated: June 26, 2017 10:21 IST

पाच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट; ८ हजार १४० शेतक-यांची मागणी.

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाऊस लहरी झाल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी कृषी विभागाने पाच हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, जवळपास ८ हजार १४० शेतकऱ्यांनी शेततळे मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवदान मिळावे, यासाठी शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.यावर्षी जिल्ह्यात ५ हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात बुलडाणा उपविभागात १ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, बुलडाणा तालुक्यात ३००, चिखली ४००, मोताळा ४०० व मलकापूर तालुक्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. खामगाव उपविभागासाठी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, खामगाव तालुका ४००, शेगाव ५००, नांदुरा ५००, संग्रामपूर ५०० व जळगाव जामोद ५०० व मेहकर उपविभागासाठी १००० शेततळ्याचे उद्दिष्ट असून, मेहकर तालुका ३००, लोणार २०० व देऊळगावराजा २५० व सिंदखेडराजा तालुक्यासाठी २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे;मात्र शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढत असल्यामुळे शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतर्गत १३ तालुक्यातून ८ हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.