शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा ओढा शेततळ्यांकडे !

By admin | Updated: June 26, 2017 10:21 IST

पाच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट; ८ हजार १४० शेतक-यांची मागणी.

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाऊस लहरी झाल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी कृषी विभागाने पाच हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, जवळपास ८ हजार १४० शेतकऱ्यांनी शेततळे मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवदान मिळावे, यासाठी शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.यावर्षी जिल्ह्यात ५ हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात बुलडाणा उपविभागात १ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, बुलडाणा तालुक्यात ३००, चिखली ४००, मोताळा ४०० व मलकापूर तालुक्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. खामगाव उपविभागासाठी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, खामगाव तालुका ४००, शेगाव ५००, नांदुरा ५००, संग्रामपूर ५०० व जळगाव जामोद ५०० व मेहकर उपविभागासाठी १००० शेततळ्याचे उद्दिष्ट असून, मेहकर तालुका ३००, लोणार २०० व देऊळगावराजा २५० व सिंदखेडराजा तालुक्यासाठी २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे;मात्र शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढत असल्यामुळे शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतर्गत १३ तालुक्यातून ८ हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.