शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

शेतक-यांचा ओढा शेततळ्यांकडे !

By admin | Updated: June 26, 2017 10:21 IST

पाच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट; ८ हजार १४० शेतक-यांची मागणी.

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाऊस लहरी झाल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी कृषी विभागाने पाच हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, जवळपास ८ हजार १४० शेतकऱ्यांनी शेततळे मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवदान मिळावे, यासाठी शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.यावर्षी जिल्ह्यात ५ हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात बुलडाणा उपविभागात १ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, बुलडाणा तालुक्यात ३००, चिखली ४००, मोताळा ४०० व मलकापूर तालुक्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. खामगाव उपविभागासाठी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, खामगाव तालुका ४००, शेगाव ५००, नांदुरा ५००, संग्रामपूर ५०० व जळगाव जामोद ५०० व मेहकर उपविभागासाठी १००० शेततळ्याचे उद्दिष्ट असून, मेहकर तालुका ३००, लोणार २०० व देऊळगावराजा २५० व सिंदखेडराजा तालुक्यासाठी २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे;मात्र शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढत असल्यामुळे शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतर्गत १३ तालुक्यातून ८ हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.