शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST

धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे ...

धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे अजूनही शेतकऱ्यांना उमजले नाही. अशातच या वर्षी कांदा बियाणांचे भाव जास्त असल्याने लागवड खर्च वाढला. त्यात आता कांद्याचे दर घसरल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

कापूस, तेलबिया व ज्वारी हे मुख्य पीक असलेल्या अकोला जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकाचे होणारे नुकसान, बाजारपेठेत मिळणारा कमी दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो. तरीही यंदा चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड करतात. या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा आला, तेव्हा शासनाने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणे कठीण झाले. सोबतच या वर्षी कांदा बियाणेही महागले. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांदा बियाण्याच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले. परिणामी, कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली. उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेने महागडे बियाणे खरेदी करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कमी होत आहेत. कांद्याला सरासरी १,००० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल दर सांगितला जात आहे. याच कांद्याला मागील १५ ते २० दिवसांआधी ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

बाजारभावाच्या किमतीतील घसरणीमुळे कांदा लागवडीचा हजारो रुपयाच्या घरात असून, तो निघणेही कठीण झालेला आहे.

- गजानन पायघन, शेतकरी धामणगांव धाड