शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः ...

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः प्रयत्नशील असून मागण्या लवकर मान्य न केल्यास पेनटाकळी प्रकल्पात स्वतः उतरून आंदोलन करणार असल्याचे आश्वासन आ. संजय रायमूलकर यांनी दिले.

पेनटाकळी प्रकल्पात उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची रविवारी आ. रायमूलकर,कृउबासचे सभापती माधवराव जाधव यांनी भेट घेतली. मेहकर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याच्या ० ते ११ किलोमीटर पर्यंतच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे ब्रम्हपुरी,दुधा,रायपूर सह या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सन २००३ पाणी कालव्याच्या पाण्यामुळे या परिसरातील शेती खारपाण पट्ट्यात बदलत असून दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. रविवारी आ. संजय रायमूलकर यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे कालवा पाझरामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत जलसंपदा मंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकरी पाईपलाईनव्दारे कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनेतचा फटाका शेतकऱ्यांना अजून सुध्दा बसत आहे. भविष्यात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी पेनटाकळी धरणाच्या पाण्यात उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत कालव्यातून पाईपलाईनव्दारे पाणी सोडल्या जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील या निर्णयावर उपोषण करणारे शेतकरी ठाम आहे. यावेळी आ. रायामूलकर यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडविण्याबाबत संवाद साधला. मात्र शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.