शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः ...

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः प्रयत्नशील असून मागण्या लवकर मान्य न केल्यास पेनटाकळी प्रकल्पात स्वतः उतरून आंदोलन करणार असल्याचे आश्वासन आ. संजय रायमूलकर यांनी दिले.

पेनटाकळी प्रकल्पात उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची रविवारी आ. रायमूलकर,कृउबासचे सभापती माधवराव जाधव यांनी भेट घेतली. मेहकर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याच्या ० ते ११ किलोमीटर पर्यंतच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे ब्रम्हपुरी,दुधा,रायपूर सह या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सन २००३ पाणी कालव्याच्या पाण्यामुळे या परिसरातील शेती खारपाण पट्ट्यात बदलत असून दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. रविवारी आ. संजय रायमूलकर यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे कालवा पाझरामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत जलसंपदा मंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकरी पाईपलाईनव्दारे कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनेतचा फटाका शेतकऱ्यांना अजून सुध्दा बसत आहे. भविष्यात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी पेनटाकळी धरणाच्या पाण्यात उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत कालव्यातून पाईपलाईनव्दारे पाणी सोडल्या जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील या निर्णयावर उपोषण करणारे शेतकरी ठाम आहे. यावेळी आ. रायामूलकर यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडविण्याबाबत संवाद साधला. मात्र शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.