शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

अतीपावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनस्तरावरून पंचनामे करून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्‍टरी ...

अतीपावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनस्तरावरून पंचनामे करून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्‍टरी दहा हजार रुपयेप्रमाणे दोन टप्प्यांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार होती. दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा करण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी या मदतीपासून आजही वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या मदतीचा अर्धा हप्ता जमा झाला होता, ते सुद्धा दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला त्यांना सुद्धा विम्याची रक्कम मिळाली नाही. थकलेले विम्याची रक्कम व ज्या लोकांनी नेटवर्कअभावी आपल्या पिकाचा विमा उतरवू शकले नाही, त्यांनाही मदत देण्याची मागणी होत आहे. नुकसान होऊनही ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने आज पर्यंत पैसे दिले नाही, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

पीक नुकसानापोटी जेवढा मदत निधी आला होता, तो वाटप करण्यात आला आहे. ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यातील निधी येईल, त्यावेळी तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

सावंत, तहसीलदार, सिंदखेड राजा