शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

शेतक-यांना रब्बी पीकविम्याचा दावा मंजूर

By admin | Updated: January 22, 2015 00:32 IST

बुलडाणा जिल्ह्यातील २११३ शेतकरी लाभार्थ्यांना नुकसानीपोटी मिळणार ६६ लाख.

गिरीश राऊत / खामगाव (जि. बुलडाणा): गतवर्षी २0१३-१४ मधील रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाचे नुकसानीपोटी जिल्ह्यातील २११३ शेतकर्‍यांना रुपये ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपयांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे. सदरची रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून, या भरपाईमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान होते. यामुळे ज्याचे सर्वकाही शेतीपिकावरच अवलंबून आहे. अशा शेतकर्‍यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे संकट उभे राहते. यामुळे शेतकर्‍यांना शासन मदत देत असले तरी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी काही वर्षांंपासून शासनाच्या अनुदानातून तसेच काही अंशी रक्कम शेतकर्‍यांकडून घेऊन पीकविमा उतरविला जातो. याच योजनेतून २0१३-१४ च्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील २५७२ शेतकर्‍यांनी गहू व हरभरा पिकाचा विमा कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे उतरविला होता. यापोटी १९ लाख १५ हजार ४१५ रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे भरली होती. तर याच वर्षी नैसर्गिक संकट येत गारपीट तसेच वादळी वार्‍यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा मंडळनिहाय सर्व्हे महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात आली सोबतच या नुकसानीच्या आधारे शेतकर्‍यांनी काढलेल्या पीकविम्याचा दावासुद्धा मंजूर झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात ज्या भागात नुकसान झाले तसेच ज्या शेतकर्‍यांनी विम्याची रक्कम भरली होती अशा जिल्ह्यातील एकूण २११३ शेतकर्‍यांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे., त्यामुळे ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपये नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रब्बी हंगामात ज्या शेतकर्‍यांचा पिकविमा दावा मंजूर झाला असल्याचे स्पष्ट केले.