शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

शेतक-यांना रब्बी पीकविम्याचा दावा मंजूर

By admin | Updated: January 22, 2015 00:32 IST

बुलडाणा जिल्ह्यातील २११३ शेतकरी लाभार्थ्यांना नुकसानीपोटी मिळणार ६६ लाख.

गिरीश राऊत / खामगाव (जि. बुलडाणा): गतवर्षी २0१३-१४ मधील रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाचे नुकसानीपोटी जिल्ह्यातील २११३ शेतकर्‍यांना रुपये ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपयांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे. सदरची रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून, या भरपाईमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान होते. यामुळे ज्याचे सर्वकाही शेतीपिकावरच अवलंबून आहे. अशा शेतकर्‍यांसमोर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे संकट उभे राहते. यामुळे शेतकर्‍यांना शासन मदत देत असले तरी जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी काही वर्षांंपासून शासनाच्या अनुदानातून तसेच काही अंशी रक्कम शेतकर्‍यांकडून घेऊन पीकविमा उतरविला जातो. याच योजनेतून २0१३-१४ च्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील २५७२ शेतकर्‍यांनी गहू व हरभरा पिकाचा विमा कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे उतरविला होता. यापोटी १९ लाख १५ हजार ४१५ रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे भरली होती. तर याच वर्षी नैसर्गिक संकट येत गारपीट तसेच वादळी वार्‍यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा मंडळनिहाय सर्व्हे महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात आली सोबतच या नुकसानीच्या आधारे शेतकर्‍यांनी काढलेल्या पीकविम्याचा दावासुद्धा मंजूर झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यात ज्या भागात नुकसान झाले तसेच ज्या शेतकर्‍यांनी विम्याची रक्कम भरली होती अशा जिल्ह्यातील एकूण २११३ शेतकर्‍यांचा पीकविम्याचा दावा मंजूर झाला आहे., त्यामुळे ६६ लाख ३१ हजार ६३१ रुपये नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रब्बी हंगामात ज्या शेतकर्‍यांचा पिकविमा दावा मंजूर झाला असल्याचे स्पष्ट केले.