शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

अशोक इंगळे साखरखेर्डा - पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन ...

अशोक इंगळे

साखरखेर्डा - पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन सेंद्रिय शेती फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. सेंद्रिय शेती पद्धतीतून जास्त उत्पादन घेता येत नाही, हा समज त्यांनी खोडून काढला आहे. त्यांनी केलेला सेंद्रिय शेतीचा अवलंब इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

साखरखेर्डा परिसरात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, संकरित ज्वारी ही पिके घेतली जातात. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मातेरे झाले. कापसाच्या वाती झाल्या, मूग सडला, अशा परिस्थितीत खचून न जाता शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकरिता कंबर कसली. मागील शासनाच्या काळात या भागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाची अनेक कामे झाली. जमिनीत जलसाठा वाढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने गहू, हरभरा या पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. साखरखेर्डा येथील कुवरसिंग मोहने हे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे संचालक म्हणून काम पाहतात. जैविक शेती मिशनचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, यासाठी त्यांनी साखरखेर्डा येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. ज्यांना जैविक शेतीचे नियोजन कळले त्यांनी त्या पद्धतीने शेती केली आणि पहिल्याच प्रयोगात यशही मिळाले.

साखरखेर्डा येथील हरीश सुधाकर देशपांडे यांनी आठ एकर शेतात सोयाबीननंतर गहू घेण्यासाठी शेतीची मशागत केली.

येथील हरीश देशपांडे यांनी पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून आठ एकरात गव्हाची पेरणी केली. रासायनिक खतांचा एकही मात्रा न वापरता शेणखत, जिवामृत यांचा वापर करून पेरणी केली. गव्हाची वाढही चार फुटांपेक्षा जास्त झाली. ९ नोव्हेंबर रोजी पेरणी केल्यानंतर चार वेळा पाणी, निंदन असा एकरी तीन हजार रुपये खर्च त्यांना आला. बन्सी जातीचा गहू असल्याने आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्याने या गव्हाची मागणी जास्त असते. आज ४० ते ४५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करून पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवितात. आज एकरी १२ क्विंटल उत्पादन घेऊन ४ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाल्याने त्यांना ८ एकरात ४ लाख ३२ हजारांचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती मिशनच्या माध्यमातून शेती किती फायद्याची आहे हे लक्षात येते.

..........प्रतिक्रिया.........

सेंद्रिय खत आणि १२ वनस्पतींपासून बनविलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली तर कोणतेही कीटक त्या पिकावर आक्रमण करू शकत नाही. या गव्हाची पोळी आरोग्याला पोषक असते. संपूर्ण नैसर्गिक वातावरण असल्याने जमिनीचा पोतही सुधारतो.

-समाधान वाघ,

कृषी सहायक, साखरखेर्डा.

............प्रतिक्रिया..............

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून मी शेती केली. त्याचा फायदा मला झाला. हीच पद्धत इतर शेतकऱ्यांनी राबविली तर शेतकरी समृद्ध होईल.

-हरीश सुधाकर देशपांडे,

आदर्श शेतकरी, साखरखेर्डा.

फोटो : हरीश सुधाकर देशपांडे यांनी पेरलेला गहू.