शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पेरे प्रमाणपत्राच्या फे-यात शेतकरी!

By admin | Updated: July 21, 2016 23:45 IST

पीक विमा योजनेत मोठी अडचण; अट शिथिल करणे आवश्यक.

चिखली (जि. बुलडाणा): नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २0१६-१७ करिता लागू करण्यात आली आहे. या पीक विम्यासाठी हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे, तर दुसरीकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ांमार्फत दिले जाणारे पेरे प्रमाणपत्राची अट घालून दिली आहे. वस्तूत: तलाठय़ांच्यावतीने १ ऑगस्टनंतरच हे प्रमाणपत्र शेतकर्‍यांना मिळणार असल्याने शेतकरीवर्ग पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुल आहे; परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतात असलेल्या पिकाचे पेरे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वस्तूत: हे पेरे प्रमाणपत्र तलाठय़ांमार्फत १ ऑगस्टनंतरच मिळणार असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ केवळ या प्रमाणपत्राअभावी शेतकर्‍यांना न मिळण्याची स्थिती सध्या तालुक्यात उद्भवली आहे. पीक विम्याचा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै, तर पेरे प्रमाणपत्र मिळण्याची तारीख १ ऑगस्टनंतरची असल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.