शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

रविवारी होणार भेंडळची प्रसिद्ध घटमांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:51 IST

महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.

- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: पिक परिस्थिती ,पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.महाराष्ट्रभर जिकडेतिकडे पाण्याचे दुर्भिक्ष त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे त्यामुळे या वर्षी पावसाचे अंदाज काय राहील याकडे संपूर्ण शेतकरी वगार्चे लक्ष लागले आहे.बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेल्या या गावी घटमांडणीची परंपरा साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकर्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात आणि यावरून पुढील खरीप आणि रब्बी हंगामाची दिशा ठरवतात आधुनिक काळात हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असते तरीही भेंडवळ घटमांडणीचे महत्त्व मात्र कमी झालेले दिसत नाही.अशा प्रकारे जनतेच्या मनात रूढ असलेली भेंडवडची घटमांडणी सात मे रोजी संध्याकाळी करण्यात येणार आहे तर या मांडणीचे भाकीत ८ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज हे जाहीर करतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, खांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थही ठेवले जातात आणि रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. दुसर्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकित वर्तविण्यात येते.त्यावरून शेतकर्यांना पिकांचा आणि पावसाचा अंदाज येतो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे, यावरून शेतकरी यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. पुंजाजी महाराज, शारंगधर महाराज आजही ही परंपरा जोपासतात. याचे नियम पाळतात व घटमांडणी करून भाकिते सांगतात.तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्व मांडणी केली जाते. या दोन्हींनी मांडणीमध्ये साम्य असते. त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निकष एकत्र जोडून हे भाकिते वर्तविली जातात. त्यामुळे यंदा ही घटमांडणी कोणते भाकित वर्तवते याकडे सध्या लक्ष लागून आहे.तीनशे वर्षांपासूनची परंपरातीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी भेंडवड येथे या घटमांडणी चा प्रारंभ केला त्या काळात कुठलीही आधुनिक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे याच घटमांडणी च्या आधारावर शेतकरी विसंबून असत आणि पीक पेरणी करतात त्यामुळे या मांडणीचे अनुभव तंतोतंत खरे खरे ठरत काळाच्या ओघात आता अनेक यंत्रणांचा शोध लागला मात्र तरीही भेंडवड घटमांडणीवरील शेतकऱ्यांचा विश्वास कायम आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद