शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

रविवारी होणार भेंडळची प्रसिद्ध घटमांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:51 IST

महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.

- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: पिक परिस्थिती ,पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.महाराष्ट्रभर जिकडेतिकडे पाण्याचे दुर्भिक्ष त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे त्यामुळे या वर्षी पावसाचे अंदाज काय राहील याकडे संपूर्ण शेतकरी वगार्चे लक्ष लागले आहे.बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेल्या या गावी घटमांडणीची परंपरा साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकर्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात आणि यावरून पुढील खरीप आणि रब्बी हंगामाची दिशा ठरवतात आधुनिक काळात हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असते तरीही भेंडवळ घटमांडणीचे महत्त्व मात्र कमी झालेले दिसत नाही.अशा प्रकारे जनतेच्या मनात रूढ असलेली भेंडवडची घटमांडणी सात मे रोजी संध्याकाळी करण्यात येणार आहे तर या मांडणीचे भाकीत ८ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज हे जाहीर करतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, खांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थही ठेवले जातात आणि रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. दुसर्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकित वर्तविण्यात येते.त्यावरून शेतकर्यांना पिकांचा आणि पावसाचा अंदाज येतो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे, यावरून शेतकरी यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. पुंजाजी महाराज, शारंगधर महाराज आजही ही परंपरा जोपासतात. याचे नियम पाळतात व घटमांडणी करून भाकिते सांगतात.तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्व मांडणी केली जाते. या दोन्हींनी मांडणीमध्ये साम्य असते. त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निकष एकत्र जोडून हे भाकिते वर्तविली जातात. त्यामुळे यंदा ही घटमांडणी कोणते भाकित वर्तवते याकडे सध्या लक्ष लागून आहे.तीनशे वर्षांपासूनची परंपरातीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी भेंडवड येथे या घटमांडणी चा प्रारंभ केला त्या काळात कुठलीही आधुनिक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे याच घटमांडणी च्या आधारावर शेतकरी विसंबून असत आणि पीक पेरणी करतात त्यामुळे या मांडणीचे अनुभव तंतोतंत खरे खरे ठरत काळाच्या ओघात आता अनेक यंत्रणांचा शोध लागला मात्र तरीही भेंडवड घटमांडणीवरील शेतकऱ्यांचा विश्वास कायम आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद