शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी होणार भेंडळची प्रसिद्ध घटमांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:51 IST

महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.

- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: पिक परिस्थिती ,पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.महाराष्ट्रभर जिकडेतिकडे पाण्याचे दुर्भिक्ष त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे त्यामुळे या वर्षी पावसाचे अंदाज काय राहील याकडे संपूर्ण शेतकरी वगार्चे लक्ष लागले आहे.बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेल्या या गावी घटमांडणीची परंपरा साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकर्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात आणि यावरून पुढील खरीप आणि रब्बी हंगामाची दिशा ठरवतात आधुनिक काळात हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असते तरीही भेंडवळ घटमांडणीचे महत्त्व मात्र कमी झालेले दिसत नाही.अशा प्रकारे जनतेच्या मनात रूढ असलेली भेंडवडची घटमांडणी सात मे रोजी संध्याकाळी करण्यात येणार आहे तर या मांडणीचे भाकीत ८ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज हे जाहीर करतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, खांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थही ठेवले जातात आणि रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. दुसर्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकित वर्तविण्यात येते.त्यावरून शेतकर्यांना पिकांचा आणि पावसाचा अंदाज येतो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे, यावरून शेतकरी यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. पुंजाजी महाराज, शारंगधर महाराज आजही ही परंपरा जोपासतात. याचे नियम पाळतात व घटमांडणी करून भाकिते सांगतात.तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्व मांडणी केली जाते. या दोन्हींनी मांडणीमध्ये साम्य असते. त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निकष एकत्र जोडून हे भाकिते वर्तविली जातात. त्यामुळे यंदा ही घटमांडणी कोणते भाकित वर्तवते याकडे सध्या लक्ष लागून आहे.तीनशे वर्षांपासूनची परंपरातीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी भेंडवड येथे या घटमांडणी चा प्रारंभ केला त्या काळात कुठलीही आधुनिक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे याच घटमांडणी च्या आधारावर शेतकरी विसंबून असत आणि पीक पेरणी करतात त्यामुळे या मांडणीचे अनुभव तंतोतंत खरे खरे ठरत काळाच्या ओघात आता अनेक यंत्रणांचा शोध लागला मात्र तरीही भेंडवड घटमांडणीवरील शेतकऱ्यांचा विश्वास कायम आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद