शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फडणवीस, दरेकरांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

यासंदर्भात आपण प्रथमत: जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चारवरिया यांना निवेदन देणार आहे. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे ...

यासंदर्भात आपण प्रथमत: जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चारवरिया यांना निवेदन देणार आहे. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या गृहमंत्रालयास अनुषंगिक तक्रार देणार असल्याचे आ. गायकवाड यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी राज्य शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तम व्यवस्थापन केले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही राज्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली होती.

यावर्षी गेल्या एक ते दीड महिन्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. त्याची घातक तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने व्यापकस्तरावर पुन्हा उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. सोबतच विविध सामाजिक, राजकीय घटकांशीही विचार विनिमय करून उपाययोजना राबविल्या आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधाही बळकट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र अशा स्थितीत केंद्राकडून मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी तसा प्रकारे राज्यातील नागरिकांना मदत न करता उलट त्यांनी त्यास विरोध केला आहे. त्यामुळे मधल्या काळात राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूस या तिघांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. यासोबतच अनेक बाबींचा ऊहापोह त्यांनी १९ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.