शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नजरा आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2014 19:13 IST

पंधरा दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

बाश्रीटाकळी : आकाशाकडे आस लावून बसलेल्या बळीराज्याच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. पंधरा दिवस उलटले तरी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. आता बळीराजांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी ठिबकचे पीकही धोक्यात आले आहे. बी-बियाणे व खतांची खरेदी झाल्याने बळीराजाकडे असलेला पैसा गुंतून पडला आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतकर्‍यांपुढे संकट उभे राहिले आहे. यंदा पाऊस लवकर पडेल, या आशेने शेतकर्‍यांनी अगोदरच खते व हव्या असलेल्या निवडक वाणांचे बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. पाऊस पडल्यास वेळेवर हवे ते बियाण्यांचे वाण मिळत नाही. त्यामुळे अगोदरच बियाण्यांची खरेदी करून ठेवावी लागते. आता प्रतीक्षा आहे ती जोरदार पाऊस पडण्याची. राजंदा परिसरात पाणी पातळी खालावल्याने शेती पीक अडचणीत आले आहे. उन्हाळ्यासारखे तापमान असल्याने जमिनीला आता पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील अनेक गावांत विहिरीतील पाणी पातळी कमी झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतकर्‍यांना पिकाच्या पाण्याबरोबरच गुरांच्या पाण्याचेही नियोजन करावे लागत असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. चारा टंचाई आणि पाणी टंचाई यामुळे शेतकरी हैराण झाला असून जनावरांची विक्री करीत आहेत. बार्शिटाकळी तालुक्यातील अनेक गावात हिच परिस्थिती असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले. मागील वर्षाप्रमाणे मृग नक्षत्राचा पाऊस होऊन पेरणी सुरू करू, असा मानस असताना एक दिवस वादळी बेमोसमी पाऊस झाला व फायद्यापेक्षाही नुकसान करून गेला. शेतकर्‍यांनी मशागत करू न मोठय़ा प्रमाणात खर्च केला. महागडी बियाणे खरेदी केली; परंतु पावसाने चिंता वाढविली आहे. महागडी बियाण्यांची पेरणी करू नही पीक घरात येईलच, याची काही शाश्‍वती नसल्यामुळे बळीराजा आतापासूनच संकटात सापडला आहे. मागील वर्षी निसर्गाने वेळेवर हजेरी लावल्याने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्या झाल्या होत्या. मृग नक्षत्रात पेरण्या झाल्यास उत्पन्न वाढते, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. २0१३ च्या दुष्काळाच्या जखमा अद्यापही भरल्या नसल्याने पाऊस कमी झाल्यास बळीराजा संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.