शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना मुदतवाढ

By admin | Updated: September 1, 2015 01:39 IST

कमी खर्चाच्या उपाययोजनेचे अधिकार जिल्हाधिका-यांना.

बुलडाणा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजनांना पुन्हा एकदा ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने ३१ ऑगस्ट २0१५ रोजी एका निर्णयान्वये घेतला आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे २१ ऑगस्ट २00९ च्या शासन निर्णयान्वये, राज्यातील नागरी भागामध्ये १ व ३ फेब्रुवारी १९९९ च्या शासन निर्णयान्वये ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांसाठी स्थायी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजना दरवर्षी ३0 जूनपर्यं त राबविण्यात येतात. यावर्षी या उपाययोजना राबविण्यासाठी ३१ ऑगस्ट २0१५ पर्यं त मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र राज्यातील काही भागात आतापर्यंत झालेले अपुरे पर्जन्यमान विचारात घेता पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी देण्यात आलेली मुदतवाढ आणखी एक महिन्यापर्यंंत म्हणजेच ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील पर्जन्यमानाची वस्तुस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागात व नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ आवश्यकता लक्षात घेऊन औरंगाबाद महसुली विभागा तील सर्व जिल्हे तसेच नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहमदनगर, पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजना घेण्यास ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे.