शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना मुदतवाढ

By admin | Updated: September 1, 2015 01:39 IST

कमी खर्चाच्या उपाययोजनेचे अधिकार जिल्हाधिका-यांना.

बुलडाणा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजनांना पुन्हा एकदा ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने ३१ ऑगस्ट २0१५ रोजी एका निर्णयान्वये घेतला आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून कमी-जास्त प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे २१ ऑगस्ट २00९ च्या शासन निर्णयान्वये, राज्यातील नागरी भागामध्ये १ व ३ फेब्रुवारी १९९९ च्या शासन निर्णयान्वये ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांसाठी स्थायी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजना दरवर्षी ३0 जूनपर्यं त राबविण्यात येतात. यावर्षी या उपाययोजना राबविण्यासाठी ३१ ऑगस्ट २0१५ पर्यं त मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र राज्यातील काही भागात आतापर्यंत झालेले अपुरे पर्जन्यमान विचारात घेता पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी देण्यात आलेली मुदतवाढ आणखी एक महिन्यापर्यंंत म्हणजेच ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील पर्जन्यमानाची वस्तुस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागात व नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ आवश्यकता लक्षात घेऊन औरंगाबाद महसुली विभागा तील सर्व जिल्हे तसेच नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहमदनगर, पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घेण्यात येणार्‍या उपाययोजना घेण्यास ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे.