शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 13:21 IST

विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास दोन दिवसांची मुदत वाढ दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीईटी आॅनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहीले होते. काहींनी फी न भरल्याने तर काही विद्यार्थी नोंदणी करू शकले नव्हते. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास दोन दिवसांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्य सामाईक परीक्षा कक्षाच्या वतीने १२ अभ्यासक्रमांसाठी आॅनलाईन परीक्षा घेण्यात येते. यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या विधी पाच वर्ष, विधी तीन वर्ष, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., बी.ए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (एकात्मीक),बी.एड / एम.एड (एकात्मिक) तसेच तंत्र शिक्षण विभागाच्या एम.एच.एम.सी.टी, बी.एच.एम.सी.टी, एम.आर्च, एम.सी.ए आदींचा समावेश आहे. या परींक्षासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली होती. परंतु, अनेक विद्यार्थी फी भरल्यानंतर आॅनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करू शकले नव्हते. तसेच काही विद्यार्थी आॅनलाईन नोंदणीही करू शकले नाही.कोरोना संसर्गामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाउनचा फटकाही विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे, जे विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहीले असतील त्यांच्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून दोन दिवस अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या दोन दिवसात विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज व परीक्षा क्षुल्क भरण्याची प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे,असे ४ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकात राज्य सामाईक परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना शेवटची संधीसर्व विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असून ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले असतील त्यांना बदल करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्र बदलण्याची सुविधा मिळणार नाही.यापूर्वी अर्ज केलेले विद्यार्थी दुसºया अभ्यासक्रमासाठी नव्याने अर्ज करू शकतात.परंतु, त्यांना आधी भरलेले परीक्षा क्षुल्क परत मिळणार नाही.एकदार सादर केलेल्या अर्जात बदल करता येणार नसल्याचे राज्य सामाईक परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रbuldhanaबुलडाणा