शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

पिके वाचविण्यासाठी कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:10 IST

लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम सोयाबीन, कपाशीला फटका!

लोकमत न्यूज नेटवर्कलिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.मोताळा तालुक्यातील लिहा बु. विभागात प्रथमपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते; मात्र परतीच्या पावसाने सुरुवातीला कमी वेळात दोन दिवस झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. या पावसामुळे विभागातील नदी, नाल्यावरील बंधार्‍यामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात कपाशी, तूर व रब्बी पिकांना एक-दोन पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो; मात्र संततधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडली असून, सोयाबीन व कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे.या आठवड्यात प्रथमपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर वधारले आहेत. हवामान खात्याच्या इशार्‍यामुळे गावातील काही शेतकर्‍यांनी मुनादी देऊन प्रचलित दरापेक्षा प्रति किलो कापूस वेचणीत वाढ करून स्वत:च्या शेतातील कापूस पावसाअगोदरच गोळा केला; परंतु कित्येक शेतकरी मजुरी वाढविण्यासाठी तयार नसल्यामुळे शेतमजूरसुद्धा जिकडे मजुरी वाढ मिळेल, त्यांच्या शेतात जाण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे मजुराप्रती शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण होताना दिसत होता.  त्यामुळे संततधार पावसाने काही शेतकर्‍यांना फटका दिला. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन शेतात सोंगणीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी काही शेतकर्‍यांच्या सोयाबीनला अंकुर फुटण्याची शक्यता आहे.ज्या शेतकर्‍यांनी मजुरी कमी होईल व दर वाढविण्यास अनुकूलता दाखविली नाही, त्यांना सदर पावसामुळे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसणार आहे. या पावसामुळे शेतात कापणीसाठी आलेले सोयाबीन, ज्वारी काळी होण्याची शक्यता असून मका, ज्वारीचा चारा काळा झाला आहे, तर सतत पाऊस असल्यामुळे साेंगणीसाठी त्रास होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या कामात कोणतीही दिरंगाई यापुढे शेतकरी वर्गासाठी नुकसानीत भर टाकणारी ठरणार आहे. त्यामुळे मजुरीत वाढ करण्याबाबत शेतकर्‍यांनी आपले धोरण बदलून लवचिक करावे व पिकाची अवस्था व निसर्गाचा लहरीपणा यामध्ये समन्वय साधून मजुरी दरात वाढ देणे आवश्यक झाले आहे.  आपल्या मालास चांगला बाजार भाव मिळण्यासाठी त्याची प्रत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना वाढीव मजुरी देत असल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.