शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

घाट नसलेल्या ठिकाणावरून रेतीचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:34 IST

राहेरी बु : सिंदखेडराजा तालुक्यात घाट नसलेल्या ठिकाणावरून रेतीचे उत्खनन करून शासनाला लाखाे रुपयांचा चुना लावला जात ...

राहेरी बु : सिंदखेडराजा तालुक्यात घाट नसलेल्या ठिकाणावरून रेतीचे उत्खनन करून शासनाला लाखाे रुपयांचा चुना लावला जात असल्याचा प्रकार समाेर आला आहे. लिलाव झालेला नसतानाही दरराेज शेकडाे ब्रास रेतीचे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

खडकपूर्णा नदी देऊळगावराजा तालुक्यातून साठेगाव शिवाराकडे सिंदखेडराजा तालुक्यात प्रवेश करते व लिंगा देवखेडपर्यंत व तेथून पुढे लोणार तालुक्याकडे जाते. रेतीघाटांची ठिकाणे निश्चित केलेल्या व लिलावात उल्लेख असलेल्या साठेगाव, हिवरखेड व तढेगाव येथील रेतीघाटातून उपसा केला जातो. त्यापायी शासनाला महसूल प्राप्त होतो. हे सर्व शासकीयस्तरावर होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन तसेच यंत्रणेतील काही व्यक्तींना हाताशी धरत रेतीघाट वगळता लिंगा, पिंपळगाव कुंडा, जऊळका, दुसरबीड, ताडशिवणी, राहेरी आदी इतरही अनेक ठिकाणांहून रेतीउपसा करणारी समान यंत्रणा धडाक्यात कार्यरत आहे. त्यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी शेती असलेल्या शेतकऱ्यांना काही रकमाही दिल्या जात आहेत व रेती वाहतुकीसाठी शेतातून रस्ते निर्माण केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात व रेती तस्करांचे फावते. एवढे झाल्यावर रेतीचोरीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेतील संबंधितांना काही रक्कम दिली जात असल्याची चर्चा आहे. यातून हजारो ब्रास रेती चोरीस गेली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. मध्यंतरी, चोखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा पात्रात पाणी सोडल्यामुळे, रेतीउपशामुळे निर्माण झालेले मोठमोठे खड्डेही झाकले गेले आहेत. यावरही युक्त्याप्रयुक्त्या लढवत पात्रात पाणी नसलेल्या ठिकाणाहूनही धडाक्याने रेतीउपसा सुरू असल्याचे आढळून येत आहे. २१ मे राेजी सकाळीच खडकपूर्णा नदीपात्रात तालुक्यातील ताडशिवणी शिवारात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला लागूनच असलेला रेतीउपसा करीत ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम सुरू होते. त्याठिकाणी रेतीघाट नसल्याचे पाहून एका व्यक्तीने जबाबदार व्यक्तीला कळवले. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसीलदार सुनील सावंत यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता तलाठी व मंडळाधिकारी यांना ताबडतोब घटनास्थळी पाठवण्याचे सांगितले गेले. परंतु, त्याअगोदरच ट्रॅक्टर रेती भरून निघूनही गेले होते.