शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पावसाळ्याच्या दिवसांमध्येही बाजारात मेथी ४० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

बुलडाणा : पावसाळ्याचे दोन महिने संपले असले तरी भाजीपाल्याचे भाव मात्र कमी होण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोरगरिबांच्या जेवणातून भाजीपालाही ...

बुलडाणा : पावसाळ्याचे दोन महिने संपले असले तरी भाजीपाल्याचे भाव मात्र कमी होण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोरगरिबांच्या जेवणातून भाजीपालाही गायब झाला आहे. कोरोनाचे भय घेऊन जगत असताना महागाईची होरपळ सर्वसामान्यांना असह्य झाली आहे. त्यामुळे ही महागाई थांबणार आहे की नाही, असा प्रश्न घराघरातून उपस्थित केला जात आहे.

मागील काही दिवसांपासून महागाईचा आलेख वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. बुलडाणा शहरात आठवडी बाजार, चिखली रोड, सर्कुलर राेड या भागात बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. सध्या भाजीपाल्याचे भाव वाढले असल्याचे दिसून येत आहे. उपरोक्त भागासह शहरात जांभरुन राेड व इतर परिसरातही प्रत्येकी एक किंवा दोन दुकाने लावण्यात येतात. याठिकाणी तर बाजारापेक्षा नेहमी जास्त भावाने भाजीपाल्याची विक्री करण्यात येत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे.

उत्पादन कमी असल्याने भावात वाढ

गेल्या महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावर झाला असून आता भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. बाजारात आवक कमी असल्याने आणखी काही दिवस भाव कमी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

व्यापारी म्हणतात...

कोरोनामुळे मागील काही दिवसांत लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापार ठप्प झाले होते; मात्र भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरूच होता. कोरोना काळात भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे लहान-मोठे व्यापारी समाधानी होते. सध्या पावसाने १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे काही भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत.

- राहुल मुळे, व्यापारी.

सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर भाजीपाल्याचे भाव काही दिवस घसरले होते; मात्र आता पावसाने दडी मारल्यामुळे काही भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. मेथीचे उत्पादन कमी असल्याने भाव वाढले आहेत. सध्या मेथी ४० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. तर पालकाची जुडी मात्र पाच रुपयाला मिळत आहे.

-पवन माेरे, भाजीपाला विक्रेते.

गृहिणी म्हणतात...

गेल्या काही वर्षांपासून महागाई सतत वाढत आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. गोरगरिबांनी जगायचे कसे. दररोजच्या जेवणातील भाजीपाला महागला असल्याने आता काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- भक्ती वाणी, गृहिणी, वाडी.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही जादा दराने भाजीपाला घ्यावा लागला. मध्यंतरी काही प्रमाणात भाव कमी झाले होते. आता मात्र पुन्हा भाव वाढल्याने पुन्हा सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

-शीतल वानखडे, गृहिणी, आंबेटाकळी.

पालेभाज्यांचे भाव (प्रतिकिलो)

मेथी, पालक, चुका, पुदिना, टोमॅटो, शेपू, बटाटे, कोथिंबीर

४० २० २० २० २५ २० २० ४० ते ५०