शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चाचण्यांमधील चढउतारानंतरही सरासरी ८०७ जण होताहेत बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:35 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात चढउतार झाले असले तरी जिल्ह्यात दररोज सरासरी ८०७ जण कोरोनाबाधित ...

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात चढउतार झाले असले तरी जिल्ह्यात दररोज सरासरी ८०७ जण कोरोनाबाधित आढळून येत असल्याचे एकंदरीत चित्र असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांवर कायम आहे. ३ व ४ मे रोजी कोरोना चाचण्यांची संख्या घटल्यानंतरही या दोन्ही दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट हा अनुक्रमे ३४ आणि २४ टक्के राहिला आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दुसरीकडे ५ मेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील चार लाख ६३ हजार ५१ संदिग्धांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची वर्तमान स्थितीतील लोकसंख्या ही २९ लाख ६४ हजार २२० आहे. त्याच्याशी तुलना करता गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील १६ टक्के नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांवर कायम आहे. जो की डिसेंबर २०२० दरम्यान ११ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला होता. परिणामी वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करण्याची अवश्यकता आहे. त्यातच जिल्ह्याचे कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५.३ दिवसांवर आले. गेल्या वर्षी हे प्रमाण ८७ दिवसांच्या आसपास होते. त्यानंतर ते ६६ दिवसांवर आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बाधितांची संख्या मात्र जिल्ह्यात कमी होत आहे, ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

-ग्रामीण भागात चाचण्या कमी

एका अंदाजानुसार जिल्ह्यातील शहरी भागात जवळपास ५५ टक्क्यांच्या आसपास रुग्ण सापडून येत असले तरी ग्रामीण भागातही हे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. नाही म्हणायला आता आरोग्य विभागाने ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांसाठी गावातच थेट शिबिर घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. तपासणी झालेले अहवाल त्वरित संबंधिताना मिळाल्यास उपाययोजना होऊन कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होईल.

-रॅपिड टेस्टवर जोर

गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील चार लाख ६३ हजार ५१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ५२ टक्के चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किटचा वापर करण्यात आला तर आरटीपीसीआरद्वारे ४५ टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या तीन टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.