कर्जवसुली थांबविण्याची मागणी
बुलडाणा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे, मोठे व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक, शेतकरी व हातावर पोट असणारे मजुरदार हे आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांनी बॅंक, खासगी फायनान्सकडून घेतलेले कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे कर्ज वसुली थांबविण्याची मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.
कालव्यांवरील झुडुपे ताेडण्याची मागणी
बुलडाणा : चिखली येथून जवळच असलेल्या मिसाळवाडी लघू प्रकल्पाच्या कालव्यावर झाडे, झुडपे वाढल्याने ते फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरील झाडे ताेडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडा : देशमुख
लाेणार : काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे. विनाकारण बाहेर पडल्यास कारवाई करण्याचा इशारा लाेणारचे ठाणेदार देशमुख यांनी दिला आहे.
बुलडाणा शहरात ५५ पाॅझिटिव्ह
बुलडाणा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच शनिवारी ५५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच तालुक्यातील नांद्राकोळी ४, दहीद २, धाड ३, चौथा ११, वरवंड ५, सिंदखेड ११, रायपूर ७, म्हसला ३, कुंबेफळ येथील दाेघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
भादाेला येथील महिलेचा मृत्यू
बुलडाणा : शहरासह ग्रामीण भागात काेराेना संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुलडाणा तालुक्यातील भादाेला येथील ६० वर्षीय महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नांदुऱ्यात काेराेनाचा उद्रेक
बुलडाणा : नांदुरा शहर आणि तालुक्यात शनिवारी काेराेनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १८७ रुग्ण नांदुरा तालुक्यात आढळले आहेत. नांदुरा शहरात ५९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील महाळुंगी १२, निमगांव १४, टाकरखेड येथील ७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
नांद्रा काेळी परिसरात चाेरट्याचा हैदाेस
बुलडाणा : तालुक्यातील नांद्रा काेळी परिसरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. दाेन दिवसांपूर्वीच चाेरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लंपास केला हाेता़. या चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
उमाळ्यात ९० पेक्षा जास्त पाॅझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यातील उमाळा येथे गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरू असून, ६०० लाेकसंख्या असलेल्या ९० पेक्षा जास्त जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.