शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पुरग्रस्त गावात पुरनियंत्रण समित्या स्थापन करा- पियुष सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

बुलडाणा : मान्सून तोंडावर आला असून, बुलडाणा जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त २६७ गावांमध्ये पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ...

बुलडाणा : मान्सून तोंडावर आला असून, बुलडाणा जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त २६७ गावांमध्ये पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, एसडीओ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत अनुषंगिक निर्देश दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २६७ गावे ही संभाव्य पूरग्रस्त गावे आहेत. पैकी ८६ गावे ही अतिप्रवण क्षेत्रात येतात. अशा गावांमध्ये प्रामुख्याने पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले आहे. सोबतच जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणखी अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच गावपातळीवर पूरनियंत्रण समित्या नियुक्त करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे.

दुसरीकडे उपलब्ध साहित्य सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासोबतच पूर येणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची उजळणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

--अतिक्रमण हटविण्याच्या सूचना--

जिल्ह्यात ग्रामीण तथा शहरी भागात नदीकाठावर तसेच नदीपात्रामध्येही काही कुटुंबे अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांचे अतिक्रमणही हटविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. अशी कुटुंबे अतिवृष्टी किंवा पुरामुळे बाधित झाल्यास त्यांना शासनाकडून मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनास विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.

--वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती--

बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने किनगाव राजा, कोलारा, घारोड , बावनबीर या चार ठिकाणी वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे. प्रामुख्याने या भागात वीज पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत आहे किंवा नाही,, याचीही पाहणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.

--जीर्ण इमारतींबाबत दक्षता--

पावसाळ्यात जीर्ण इमारती पडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. ते पाहता, शहर तथा ग्रामीण भागातील अशा जीर्ण इमारतींची पाहणी अभियंत्यांमार्फत करण्यात येऊन पावसाळ्यात या इमारती राहण्यायोग्य आहेत किंवा नाही, याची खात्रीही करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.