शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कंत्राटी कामगारांचे वेतन थकले

By admin | Updated: January 1, 2015 00:41 IST

क्षयरोग नियंत्रण कर्मचा-यांवर उपासामारी ; १ जानेवारीपासून असहकार आंदोलन.

बुलडाणा : सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काम करणार्‍या राज्यातील सुमारे १७00 कर्मचार्‍यांचे मागील पाच महिण्यापासून वेतन तर तीन वर्षापासून प्रवसभत्ता मिळाला नसल्यामुळे या कर्मचार्‍यावर उपासमारीची पाळी आली आहे. या बाबत वारंवार पाठपुराव करूनही प्रशासनाने दाद न दिल्यामुळे अखेर कर्मचार्‍यांनी १ जानेवारी पासून मासिक अहवाल तयार न करण्याच निर्णय घेवून असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण उपक्रम हा केंद्र शासनाच्या वतीने राबविल्या जात आहे. महाराष्ट्रात हा उपक्रम आरोग्य सेवा संचालनालयामार्फत राबविल्या जात असून राज्यात १७00 कंत्राटी कर्मचारी मागील १५ वर्षापासून अत्यल्प मानधन तत्वावर काम करीत आहेत. बुलडाणा, अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यात सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण विभागात कर्मचार्‍यांची संख्या जवळपास १00 आहे. क्षय रोगासारख्या संसर्गजन्य आजाराची जोखीम पत्कारून काम करणार्‍या या कर्मचार्‍यांचे मागील पाच महिण्यापासून वेतन मिळाले नाही. विशेष म्हणजे या कर्मचार्‍यांना नियमित दौरे करून रुग्णांवर औषधोपचार करावा लागतो. त्यासाठी स्वत:च्या वाहनाने फिरावे लागते. मात्र तब्बल तीन वर्षापासून या कर्मचार्‍यांना वाहन भत्ता सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. तर कर्मचार्‍याच्या कामावरही परिणाम झाला हात आहे. यापुर्वी अनेकवेळा कर्मचार्‍यांनी वेतन मिळण्यासाठी आरोग्य संचालक तसेच स्थानिक अधिकार्‍यांना निवेदने देवून सुध्दा अद्याप या कर्मचार्‍यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या १ जानेवारी पासुन राज्यातील कर्मचार्‍यांनी मासिक व त्रैमासिक अहवाल तयार न करण्याचा निर्णय घेतला आहे. *एकाच पदाला दोन वेतनश्रेणी सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण उपक्रम हा केंद्र शासनामार्फत चालविल्या जात आहे. या विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मात्र वेगवेगळी वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कर्मचार्‍यांना २४ हजार रुपये वेतन मिळते तर महाराष्ट्रात मात्र १५ हजार रुपये दिल्या जात असल्यामुळे कर्मचार्‍यांवर हा अन्याय असून उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी या कर्मचार्‍यांची आहे.