चिखली : येत्या दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदींच्या निवडणुका होणार आहेत. या पृष्ठभूमीवर चिखली मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत पक्षकार्यासाठी वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. कार्यकर्त्यांच्या या लढाईत कोणतीही कसर राहू नये यासाठी आमदार श्वेता महाले प्रयत्नरत असून त्यानुषंगाने पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या पृष्ठभूमीवर आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित उंद्री सर्कलमधील युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये गोपाल शिंदे, अजय गिऱ्हे, शुभम उगले, कुशल उगले, सचिन दांदडे, योगेश काळे, नारायण लाहुडकर, अनिल जोशी, गोपाल जाधव, शिवा सोनुने, खेमराज चव्हाण, प्रकाश चव्हाण, तेजराव चव्हाण, गजानन तायडे, संजय जाधव, योगेश राठोड, ज्ञानेश्वर बिदलकर, गणेश जाधव, माणिक जाधव, गोपाल जाधव, नंदकिशोर वाघ आदींचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, जिल्हा सचिव संजय महाले, संतोष जराड, अनिल सपकाळ, दत्ता इंगळे, गजानन पवार, आदी पदाधिकारी व बहुसंख्य युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाला जतनेकडून भरभरून आशीर्वाद मिळणार : आ.महाले.
राज्यातील तिघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. या सरकारकडून राज्यातील जनतेला कोणत्याही प्रकारे दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याने येत्या निवडणुकीत भाजपाला जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळणार असल्याचा, विश्वास आमदार श्वेता महाले यांनी यावेळी व्यक्त केला.