शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पाण्यासाठी महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतीत धडकला घागर मोर्चा

By ब्रह्मानंद जाधव | Updated: June 5, 2023 16:05 IST

मलकापूर पांगरा येथील चित्र : सरपंच पतीला घातला घेराव

मलकापूर पांगरा : येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी एल्गार पुकारून ५ जून रोजी थेट ग्रामपंचायत कार्यालयात घागर मोर्चा नेला. यावेळी सरपंच पतीला घेराव घालत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. विहिरीवरून पाण्याच्याटाकीपर्यंत येणाऱ्या व्हॉल्ववर असलेले अवैध नळ कनेक्शन तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली.

पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर अवैध नळ सुरू राहतात. गावातील पाईपलाईन दुरुस्त नसून ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे खाली पाणी मिळत नसल्याने अवैध असलेले नळ कनेक्शन कट करण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी महिलांनी हा मोर्चा काढला. मलकापूर पांगरा येथे नळ योजनेसाठी दोन कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत. परंतू पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर पांगरा वासीयांना भटकंती करावी लागत आहे. मलकापूर पांगरा नळ योजनेसाठी हनवतखेड येथे स्वतंत्र विहीर आहे. त्यानंतर केशव शिवनी येथे दुसरी विहीर आहे.

मुबलक पाणी असताना देखील १५ दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जातो. त्याच ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे एखाद्या वार्डात अवैध नळ कनेक्शनवर रात्रंदिवस पाणी सुरू राहते. तर काही भागात नळाला थेंबभर पाणी येत नाही. वार्ड क्रमांक एक व चारमधील महिलांना पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये गावातील अनेक महिलांचा सहभाग होता.

नळ योजना सुरू झाल्यापासून लोकांनी अवैध कनेक्शन घेऊन ठेवलेले आहेत. ते आमच्या निदर्शनास आले असून नोटीस बजावून ते तातडीने कट करण्यात येतील. चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.-अनिता बंडू उगले, सरपंच, मलकापूर पांगरा.

मुख्य पाईपलाईनवरील अवैध कनेक्शन कट करण्यात येईल. तसे अवैध कनेक्शनधारकांना आम्ही नोटिसा बजावणार आहोत. एका ठिकाणी वाॅल्व टाकावा लागतो, ते येत्या चार दिवसात वाॅल्व टाकून पाणी प्रश्न सुरळीत करण्यात येईल.-वसंतराव चेके, ग्रामविकास अधिकारी, मलकापूर पांगरा.