शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

विजेचा लपंडाव सुरु

By admin | Updated: July 20, 2014 23:35 IST

वीज वितरणला समस्यांचे ग्रहण

साखरखेर्डा : येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीनंतरही ३३ के.व्ही.अंतर्गत विद्युतचा लपंडाव सुरुच आहे. आकाशात ढग जरी जमा झाले, तरी विद्युतपुरवठा खंडीत होत असून वीज वितरण कंपनीला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या केंद्रांतर्गत राताळी, मोहाडी, माळखेड, शिंदी, वरोडी, गुंज, सावंगीभगत, गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, सायाळा, लिंगा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, कंडारी, भंडारी, जागदरी, आंबेवाडी, दरेगाव, तांदुळवाडी या गावात आणि कृषी क्षेत्रात वीज पुरवठा केला जातो. या ३३ के.व्ही.वर मेहकर येथील ३३ के.व्ही.वाहिनीवरुन वीज प्रवाह होतो. मेहकर ते साखरखेर्डा या वाहिनीला तब्बल ७0 वर्षे झाली असून, संपूर्ण तार जीर्ण झाली आहे. त्यामुळे तारा तुटून विद्युत पुरवठा १२ ते २४ तास पर्यंत खंडीत राहतो. गत ३ ते ४ वर्षापासून विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. केवळ अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बदली केली जाते. परंतु जो बिघाड नेहमी नेहमी होतो त्यात कायमस्वरुपी दुरुस्ती होत नाही. १४ जुलै रोजी रात्री १२ वाजता रिमझीम पावसाला सुरुवात झाली. ५ मिनीटही पाऊस पडला नाही. वीज मात्र १२ तास गुल राहिली. हा विजेचा खेळ कायमचा थांबावा आणि सक्षम अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, सेना कार्यकर्त्यांनी मागणी रेटून धरली. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांची बदली होऊन २0 दिवस झाले. परंतु नविन कनिष्ठ अभियंता येथे देण्यात आला नाही. येथे १0 लाईनमनची गरज असतांना एकही लाईनमन नाही. तसेच दहा विद्युत सेवकाची पदे असतांना तीनच कार्यरत आहेत. केवळ ४ ऑपरेटर अंतर्गत काम पाहिल्या जाते. आज या कार्यालयात १७ कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंत्यांचे पद रिक्त आहे. ३३ उपकेंद्रात ५ पॉवरची ३ ट्रान्सफार्मर आहेत. कृषीची ग्राहक संख्या सतत वाढत असून, वीज प्रवाह वाहून नेणारी, वाहिनी तार तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही जीर्ण झाले आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो.याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.