शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

विजेचा लपंडाव सुरु

By admin | Updated: July 20, 2014 23:35 IST

वीज वितरणला समस्यांचे ग्रहण

साखरखेर्डा : येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीनंतरही ३३ के.व्ही.अंतर्गत विद्युतचा लपंडाव सुरुच आहे. आकाशात ढग जरी जमा झाले, तरी विद्युतपुरवठा खंडीत होत असून वीज वितरण कंपनीला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या केंद्रांतर्गत राताळी, मोहाडी, माळखेड, शिंदी, वरोडी, गुंज, सावंगीभगत, गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, सायाळा, लिंगा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, कंडारी, भंडारी, जागदरी, आंबेवाडी, दरेगाव, तांदुळवाडी या गावात आणि कृषी क्षेत्रात वीज पुरवठा केला जातो. या ३३ के.व्ही.वर मेहकर येथील ३३ के.व्ही.वाहिनीवरुन वीज प्रवाह होतो. मेहकर ते साखरखेर्डा या वाहिनीला तब्बल ७0 वर्षे झाली असून, संपूर्ण तार जीर्ण झाली आहे. त्यामुळे तारा तुटून विद्युत पुरवठा १२ ते २४ तास पर्यंत खंडीत राहतो. गत ३ ते ४ वर्षापासून विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. केवळ अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बदली केली जाते. परंतु जो बिघाड नेहमी नेहमी होतो त्यात कायमस्वरुपी दुरुस्ती होत नाही. १४ जुलै रोजी रात्री १२ वाजता रिमझीम पावसाला सुरुवात झाली. ५ मिनीटही पाऊस पडला नाही. वीज मात्र १२ तास गुल राहिली. हा विजेचा खेळ कायमचा थांबावा आणि सक्षम अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, सेना कार्यकर्त्यांनी मागणी रेटून धरली. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यांची बदली होऊन २0 दिवस झाले. परंतु नविन कनिष्ठ अभियंता येथे देण्यात आला नाही. येथे १0 लाईनमनची गरज असतांना एकही लाईनमन नाही. तसेच दहा विद्युत सेवकाची पदे असतांना तीनच कार्यरत आहेत. केवळ ४ ऑपरेटर अंतर्गत काम पाहिल्या जाते. आज या कार्यालयात १७ कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंत्यांचे पद रिक्त आहे. ३३ उपकेंद्रात ५ पॉवरची ३ ट्रान्सफार्मर आहेत. कृषीची ग्राहक संख्या सतत वाढत असून, वीज प्रवाह वाहून नेणारी, वाहिनी तार तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही जीर्ण झाले आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो.याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.