शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विद्युत टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी अर्ज दाखल करावे : टॉवर विरोधी कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:24 IST

बुलडाणा : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त  शेतकऱ्यांनी  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २००८ पासून ४०० के.व्ही. व ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्यामध्ये सन २००८ पासून ४०० के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाईनची कामे सुरू झाली. राज्यात एकूण १ लाख ५० हजार टॉवर असून २ टॉवर मधील अंतर १ हजार फुट आहे. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकºयांना याचा फटका बसलेला आहे.

बुलडाणा : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त  शेतकऱ्यांनी  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २००८ पासून ४०० के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाईनची कामे सुरू झाली, ही कामे करताना शेतकºयांना नुकसानीचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी संपूर्ण राज्यात विद्युत टॉवरग्रस्त शेतकºयांना मोबदला मिळावा यासाठी आंदोलने केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मंत्रालयात जवळपास ४० बैठका घेतल्या आणि महाराष्ट्र  शासनाने ३१ मे २०१७ रोजी जाहीर केले असून राज्यातील ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत व वाहिनीच्या तारेखालील जमीनीचा मोबदला देणे बाबतचे धोरण तयार केले आहे. त्यानुसार सदर अर्ज विद्युत टॉवरग्रस्त व विद्युत टॉवरच्या तारेखालील आलेल्या जमीनीच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज करावयाचा आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, औंरगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून जास्त टॉवर गेले असून राज्यात एकूण १ लाख ५० हजार टॉवर असून २ टॉवर मधील अंतर १ हजार फुट आहे. या २ टॉवरमध्ये ५/७ शेतकºयांच्या शेतावरून विद्युत तार जाते. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकºयांना याचा फटका बसलेला आहे.विद्युत टॉवरखाली आलेल्या जमीनीचे क्षेत्र मोजून त्या क्षेत्राच्या दीडपट करून तसेच जमीनीचा त्या भागातील रेडीरेकनरचा दर दुप्पट करून मोबदला द्यायचा आहे. यापुर्वी विद्युत टॉवरग्रस्त टॉवरग्रस्त शेतकºयांना जो मोबदला देण्यात आला, तो मोबदला पिकाच्या नुकसानीचा असून जी कंपनी संबंधीत काम करीत आहे, त्यांनी दिलेला आहे. त्यांनी जमीनीचे मुल्यांकन काढून नुकसानीचा मोबदला दिलेला नाही. तसेच विद्युत टॉवरग्रस्त शेतकºयांच्या ७/१२ वर टॉवरची नोंद घेतलेली नाही आता टॉवरची नोंद ७/१२ वर घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनी टॉवरची नोंद त्वरीत करावी, तसेच ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकºयांना नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकºयांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांचेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती,महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण