शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वगुण विकासासाठी निवडणूक आवश्यक

By admin | Updated: July 16, 2015 01:31 IST

लोकमत परिचर्चेत विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांचा सूर.

बुलडाणा : महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. गेल्या १९९२ पासून या विद्यार्थी परिषद निवडणुकींवर बंदी घातली आहे. आता ही बंदी उठवून निवडणुकी पुन्हा सुरू झाल्यास निश्‍चितच आनंद होईल. नेतृत्वगुणांच्या विकासासाठी निवडणुकी आवश्यकच आहेत, असा सूर लोकमत परिचर्चेत सोमवारी विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी परिषद निवडणूकया विषयावर विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली असता, विद्यार्थी नेत्यांसह विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकी खुल्या पद्धतीने तसेच मोकळ्या वातावरणात व्हाव्यात, यावर सर्वांचे एकमत झाले. राजकीय हस्तक्षेप आणि दबावदेखील या निवडणुकींमध्ये येता कामा नये. खुल्या आणि मोकळ्या वातावरणात निवडणुकी घेण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत याबाबतही शासनाने आधी भूमिका स्पष्ट करावी, असे मतदेखील विद्याथ्र्यी नेत्यांनी मांडले. या निवडणुकींना हिंसक वळण लागणार नाही, याचीही काळजी राज्य शासनाला घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परिचर्चेत मनसे विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष शैलेंद्र कापसे, महाविद्यालयीन विद्यार्थी कन्हैया माटोले, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत, भाजप विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष नितीन बेंडवाल, स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन तसेच रुद्र ग्रुपचे गौरव टाकसाळ यांनी सहभाग नोंदविला.