शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
3
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
4
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
5
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
6
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
7
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रिया राष्ट्रीय उत्सव - गौरी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:42 IST

. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

ब्रम्हानंद जाधव विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. या आरचासंहितेचा भंग झाल्याची तक्रार आल्यास १०० मिनीटाच्या आत त्याचा निपटारा लावला जातो. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

निर्भय व नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

- जिल्ह्याची भौगोलिक सीमा मध्य प्रदेश राज्यास लागून असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील संबंधित जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘एफएसटी’ ‘एसएसटी’ ‘व्हीएसटी’ टीम नियुक्त करण्यात आले आहेत. आंतरराज्यस्तरावरील चार आणि जिल्हास्तरावर १२ चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार २६३ मतदान केंद्र असून सर्व केंद्रावर ‘एएमएफ’ उपलब्ध करून दिली आहे. केंद्रावर जवळपास १० हजार ६०० निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर २१७ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

खर्चाचे नियोजन कसे आहे?

- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २३ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे पहिल्या टप्प्यात २८ लाख तर दुसºया टप्प्यात १४ कोटी असा एकुण १४ कोटी २८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तसे इस्टीमेट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून निधीची उपलब्धता करून घेता येईल.

कामाच्या व्यापात आरोग्य कसे सांभाळता?

- निवडणुकीची कामे करताना रात्री अनेकवेळा उशीरही होतो. तर कधी सकाळपासूनच कामे सुरू असतात, त्यामुळे आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष होते. त्यासाठी आवश्यक तो पुरेसा आहार व थोडा व्यायाम कार्यक्षमता टिकविण्यासाठी करते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा काय?

- लोकसभा निवडणूक २०१९ चा अनुभव पाठीशी असल्याने त्याचप्रमाणे त्यावेळी आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच गोष्टींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘गो व्होट’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया हा राष्ट्रीय उत्सव असतो. ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महसूल सोबतच सर्वच विभागाची आहे

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019