शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीने ‘राजकारण’ तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:27 IST

जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतर होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. जवळपास १०० च्या आसपास मतदार आहेत. २२ आॅगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. मात्र, अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला असून, उद्या २८ आॅगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत नेमके किती अर्ज दाखल होतात, यावर या निवडणुकीतील लढती अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  साधारणत: १० महिन्यांपूर्वी वाशिम, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कारंजाचा अपवाद वगळता वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेत शिवसेना-भाजपा या पक्षाने बºयापैकी जागा मिळविल्या तर कारंजा नगर परिषदेत भारिप-बमसंने सर्वाधिक जागा मिळवित निर्विवाद सत्ता हस्तगत केली. रिसोड नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडून येण्यासाठी सदस्य संख्या जूळविण्यात शिवसेना, भाजपा, भारिप-बमसंसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.  २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत जिल्हाधिकाºयांकडे अपील करता येणार आहे. अपिलानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर असून १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. १५ सप्टेंबर २०१७ रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणूकीत शिवसेना व भाजपाची युती होते की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारंजा, वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये पहिल्यांदाच भारीप-बमसंचा उमेदवार पाठविण्याच्या दृष्टिने भारीप-बमसंनेही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तिनही नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांचे कसब पणाला लागणार, असे बोलले जात आहे.