शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीने ‘राजकारण’ तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:27 IST

जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतर होणार चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. लहान नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्त्री, सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्री असे एकूण तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदान करण्यास पात्र असणार आहेत. जवळपास १०० च्या आसपास मतदार आहेत. २२ आॅगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. मात्र, अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला असून, उद्या २८ आॅगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीपर्यंत नेमके किती अर्ज दाखल होतात, यावर या निवडणुकीतील लढती अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  साधारणत: १० महिन्यांपूर्वी वाशिम, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कारंजाचा अपवाद वगळता वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेत शिवसेना-भाजपा या पक्षाने बºयापैकी जागा मिळविल्या तर कारंजा नगर परिषदेत भारिप-बमसंने सर्वाधिक जागा मिळवित निर्विवाद सत्ता हस्तगत केली. रिसोड नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. निवडून येण्यासाठी सदस्य संख्या जूळविण्यात शिवसेना, भाजपा, भारिप-बमसंसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.  २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर त्याचदिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाईल. फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाविषयी ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत जिल्हाधिकाºयांकडे अपील करता येणार आहे. अपिलानंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर असून १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. १५ सप्टेंबर २०१७ रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणूकीत शिवसेना व भाजपाची युती होते की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारंजा, वाशिम व मंगरूळपीर नगर परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमध्ये पहिल्यांदाच भारीप-बमसंचा उमेदवार पाठविण्याच्या दृष्टिने भारीप-बमसंनेही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तिनही नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांचे कसब पणाला लागणार, असे बोलले जात आहे.