शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांची तहान अधिग्रहणावर!

By admin | Updated: April 11, 2016 01:18 IST

मोताळा तालुक्यातील ५४ गावे टंचाईग्रस्त; अधिग्रहणाचा ओघ वाढला.

मोताळा : यावर्षीही पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्याची उन्हाची तीव्रता पाहता पुढील दिवसात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त म्हणून ५४ गावांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक गावांतील नागरिकांना एक ते दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागातील लहान प्रकल्पावरून कार्यान्वित असलेल्या नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठला असून, गावागावांतील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. काही गावांमध्ये मार्चअखेरीस पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने आठ गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. नळगंगा व पलढग प्रकल्प वगळता जवळपास पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.