शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्यातील ६४० संगणक चालकांचे आठ महिन्यांचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:38 IST

 धोत्रा नंदई (जि. बुलडाणा) : गेल्या सात ते आठ महिन्यानचे वेतन थकल्यामुळे जिल्ह्यातील ६४० ‘आपले सरकार’ सेवा केंद्र परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे शासनाच्या मिळणाऱ्या  विविध योजना नागरिकांना गावपातळीवर मिळाव्यात याकरीता आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. . आपले सरकार केंद्र चालक म्हणून सुशिक्षीत बेरोजगार युवकांना गुणवत्तेनुसार यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. परंतु मागील सहा ते सात महिन्याच्या कालावधीपासून  वेतन थकल्यामुळे आपले सरकार केंद्र चालकासह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे.

- गजानन भालेकर

 धोत्रा नंदई (जि. बुलडाणा) : गेल्या सात ते आठ महिन्यानचे वेतन थकल्यामुळे जिल्ह्यातील ६४० ‘आपले सरकार’ सेवा केंद्र परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी केंद्र चालक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडक देणार आहेत.महा-आॅनलाईन कंपनीचा शासनाशी असलेला करार संपल्याने संगणक परिचालकांचे समायोजन आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून करण्यात येवून त्यांना डिसेंबर २०१६ मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यामुळेकाम पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहे. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी २०१६ या तीन महिन्याचे वेतन (सीएससी) एसपीव्ही कंपनीकडून शासनाच्या करारानुसार देण्यात आले. परंतु त्यानंतर मार्च, एप्रील, मे, जून, जुलै व आॅगस्ट या सहा महिन्याचे वेतन तब्बल सहा महिन्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये देण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी फेब्रुवारी २०१८ या महिन्याचे वेतन सिएससी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे देण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६४० आपले सरकार सेवा केंदचालकावर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रामपंचायतच्या जमाखर्चाचा आॅनलाईन लेखा-जोखा, जन्म-मृत्युच्या नोंदी या सहा विविध दाखल्यांच्या आॅनलाईन नोंदी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मिळणाऱ्या  विविध योजना नागरिकांना गावपातळीवर मिळाव्यात याकरीता आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये शेतकºयांचे कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज देखील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून भरण्यात आले आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा अमरावती विभागातून अर्ज भरण्यात अव्वल आहे. ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेला आपले सरकार सेवा केंद्राचा निधी वर्ग केलेला असतानाही केंद्र चालकांना आपले वेतन मिळालेले नसल्याने कंपनीवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. आपले सरकार केंद्र चालक म्हणून सुशिक्षीत बेरोजगार युवकांना गुणवत्तेनुसार यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. त्यांना महिनाभराचे वेतन म्हणून सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील सहा ते सात महिन्याच्या कालावधीपासून  वेतन थकल्यामुळे आपले सरकार केंद्र चालकासह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तात्काळ जिल्ह्यातील सर्व केंद्र चालकाचे थकीत असलेले वेतन कंपनीने काढण्याची गरज निर्माण झाली आहे. याची संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी संगणग परिचालक संघटनेचे मंगेश खराट, गणेश काकड, नंदू मुंढे, राज पटावकर , मिलन शेळके यांनी केली आहे.चौदा वित्त आयोगातून आपले सरकार सेवा केंद्राची रक्कम जमादेऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामपंचायत जवळखेड, धोत्रानंदई, शिवणी आरमाळ, रोहणा, नागणगाव, उंबरखेड, पाडळी शिंदे, पिंपळगाव चिलमखा या ग्रामपंचायतच्या केंद्र चालकांना गेली पाच ते आठ महिन्यापर्यंतचे कोणतेच मानधन मिळाले नाही. तसेच या ग्रामपंचयतींनी चौदा वित्त आयोगामधून जिल्हा परिषदेला आपले सरकार सेवा केंद्राची रक्कम जमा केलेली असून सुद्धा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे या सर्व केंद्रचालकांचे मानधन झालेले नाही.दोन दोन, तीन तीन ग्रामपंचायतीचा कारभार एकाच संगणक परिचालकाकडे देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. याबाबत वरित दखल घेवून न्याय देण्याची गरज आहे.-मंगेश खराट, अध्यक्ष, संगणक परिचालक संघटना, देऊळगाव राजा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा