शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर पं.स.चा शिक्षण विभाग वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 13:55 IST

शिक्षण विभागातील कर्मचारी मुख्यालयी न राहता घरुनच कारभार करीत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.

मंगरुळपीर : येथील पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील कर्मचारी मुख्यालयी न राहता घरुनच कारभार करीत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे. पंचायत समितीचे मुख्य आणी महत्वाचा विभाग समजल्या जाणाऱ्या  शिक्षण विभागात सध्या कर्मचारी तसेच खुद्द गटशिक्षण अधिकारीच लेटलतीफशाही चालवत असुन कार्यालयात क्वचीतच दिसतात.  याविषयी विचारणा केल्यास शासनाने खुप कामे लावली असल्याने कार्यालयात येणे होत नसल्याचे वेळकाढु कारण मांडल्या जाते. वरिष्ठच कार्यालयात नसल्याने इतर कर्मचाऱ्यांना फावत असुन तेही मनमानीपणे कारभार चालवत आहेत . तसेच अधिकारी , कर्मचाऱ्यांना वेळेचाही अंकुश राहीलेला नाही. शिक्षण विभागात बायोमॅट्रीक पध्दतीचा अवलंब केल्यास लेटलतीफशाहीवर अंकुश बसेल. कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित आणी मनमानी कारभार या सर्व प्रकारामुळे ज्ञानप्रक्रीयेला तालुक्यात वाळवी लागत आहे. आपली शाळा सोडुन अनेक शिक्षक पं.स.कडे घिरट्या घालतांना दिसतात . त्यामुळे शाळा वाऱ्यावर राहत असुन गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे . शिक्षण विभागाच्या खेळखंडोब्यामुळे सरकारी शाळांकडे लक्ष दिल्या जात नसल्याने पालकांचा खाजगी शाळेकडे कल वाढलेला आहे.एकीकडे शासन करोडो रुपये शिक्षणावर खर्च करीत आहे तर दुसरीकडे शिक्षणाचे शिलेदारच कर्त्यव्याकडे पाठ फिरवत असल्याने जि.प.च्या बहूतांश शाळामधील विद्यार्थी संख्या घटत आहे. अनेक शिक्षक राजकारणात स्वारस्य ठेवुन कत्यव्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिप.च्या बऱ्याच शाळांची दुरावस्था झाल्याने डागडुजीकडे लक्ष देणे गरजेचे आहे परंतु याकडे संबधीतांचे लक्षही नाही त्यामुळे पावसाळ्यात शाळा गळत  असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोय होवु शकते .गटशिक्षण अधिकारी मुख्यालयी न राहता अकोल्यातुनच कारभार पाहत असुन भ्रमणध्वनीव्दारेच कर्मचाऱ्यांना सुचना देतात.अधिकारीच कार्यालयात नसल्याने कर्मचारीही टोलवाटोलवीची उत्तरे देवून वेळ मारुन नेतात. शिक्षण विभागाचा सर्व कारभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचाच भरवश्यावर चालवला जात आहे यामुळे शिक्षकांचा कामचुकारपणा अधिकच वाढत आहे.शिक्षणाच्या विविध उपक्रमासंदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील यांनी आढावा बैठकी घेतल्या, परंतु नेहमी शिक्षण विभागच ढांग असल्याचे निर्दशनात आल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या कामचुकार प्रणालीवर सुधारणा करण्यासाठी आता कामचुकार शिक्षण कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाईच करावी अशी मागणी होत आहे.कोणत्याही सभा आणी प्रशिक्षणाला बहूतांश शिक्षक कॅन्टिंग आणी पानटपरीवरच दिसत असल्याने प्रशिक्षणावरचा खर्चही व्यर्थ जात आहे. अनेक केंद्रप्रमुखही प्रत्यक्ष शाळा तपासनी न करता घरुनच अहवाल बनवतात त्यामुळे शिक्षणांचा गचाळपणा कधी चव्हाट्यावर आला नाही , त्यामूळे वरिष्ठांनीच विविध शाळांवर आकस्मिक भेटी द्याव्यात म्हणजे सत्यसमोर येण्यास मदत होईल.