शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देशात आर्थिक विषमता वाढत आहे ! - जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:23 IST

खामगाव:  देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे  असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे.

ठळक मुद्दे लोकसंख्येच्या तुलनेत आपण चीनलाही मागे टाकत आहोत, परंतु मात्र जिडीपीमध्ये आपल्याला संपुर्ण देशाने मागे टाकले आहे.देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे  असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप. यावर उपाय म्हणजे सगळ्यांना समान वागणुकीसोबतच सगळ्याना समान संधी आणि समान लाभ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

खामगाव: लोकसंख्येच्या तुलनेत आपण चीनलाही मागे टाकत आहोत, परंतु मात्र जिडीपीमध्ये आपल्याला संपुर्ण देशाने मागे टाकले आहे. सत्तेतील पक्षाच्या ध्येय धोरणामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब बनत चालला आहे.  देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे  असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे. ते येथील विश्राम गृह्रात मंगळवारी १६ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अब्दुल मोहसिन शेख, मोहम्मद जियाउद्दीन, डॉ. शेख यासीन आणि सय्यद जुनैद यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना ऐजाज अहेमद अस्लम म्हणाले की, जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यभर शांती, प्रगती व मुक्तीसाठी जनजागरण केले जात आहे. या दरम्यान ठिक-ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन समाज बांधवाना शिक्षणाचे महत्व सांगून शांती आणि त्यातून साधता येणारी प्रगती आणि त्यानंतर मुक्तीचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत ऐजाज अहेमद अस्लम म्हणाले की, सध्याचे सरकार प्रत्येक सभेत विकासाची भाषा करत आहे. परंतु हेच सरकार एकाला चांगली तर दुसºयाला वाईट वागणुक देत आहे. एकीकडे एका धर्माला समाजाला सर्वकाही देत असताना दुसºयाला का दुर लोटले जात आहे असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय राज्यघटनेनुसार सगळ्याच बाबतीत हक्कासोबत न्याय देणे महत्वाचा असताना याच देशात चक्क न्यायधिशांना न्यायासाठी जनतेसमोर येण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. यावर उपाय म्हणजे सगळ्यांना समान वागणुकीसोबतच सगळ्याना समान संधी आणि समान लाभ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव