शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

देशात आर्थिक विषमता वाढत आहे ! - जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:23 IST

खामगाव:  देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे  असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे.

ठळक मुद्दे लोकसंख्येच्या तुलनेत आपण चीनलाही मागे टाकत आहोत, परंतु मात्र जिडीपीमध्ये आपल्याला संपुर्ण देशाने मागे टाकले आहे.देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे  असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप. यावर उपाय म्हणजे सगळ्यांना समान वागणुकीसोबतच सगळ्याना समान संधी आणि समान लाभ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

खामगाव: लोकसंख्येच्या तुलनेत आपण चीनलाही मागे टाकत आहोत, परंतु मात्र जिडीपीमध्ये आपल्याला संपुर्ण देशाने मागे टाकले आहे. सत्तेतील पक्षाच्या ध्येय धोरणामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब बनत चालला आहे.  देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे  असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे. ते येथील विश्राम गृह्रात मंगळवारी १६ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अब्दुल मोहसिन शेख, मोहम्मद जियाउद्दीन, डॉ. शेख यासीन आणि सय्यद जुनैद यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना ऐजाज अहेमद अस्लम म्हणाले की, जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यभर शांती, प्रगती व मुक्तीसाठी जनजागरण केले जात आहे. या दरम्यान ठिक-ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन समाज बांधवाना शिक्षणाचे महत्व सांगून शांती आणि त्यातून साधता येणारी प्रगती आणि त्यानंतर मुक्तीचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत ऐजाज अहेमद अस्लम म्हणाले की, सध्याचे सरकार प्रत्येक सभेत विकासाची भाषा करत आहे. परंतु हेच सरकार एकाला चांगली तर दुसºयाला वाईट वागणुक देत आहे. एकीकडे एका धर्माला समाजाला सर्वकाही देत असताना दुसºयाला का दुर लोटले जात आहे असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय राज्यघटनेनुसार सगळ्याच बाबतीत हक्कासोबत न्याय देणे महत्वाचा असताना याच देशात चक्क न्यायधिशांना न्यायासाठी जनतेसमोर येण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. यावर उपाय म्हणजे सगळ्यांना समान वागणुकीसोबतच सगळ्याना समान संधी आणि समान लाभ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव