शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जलवाहिनीला गळतीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:30 IST

अमडापूर हे गाव चिखली तालुक्यातील सर्वात मोठे आहे. मात्र या गावच्या पाणी समस्येचा विषय वेळोवेळी समोर येत आहे. ...

अमडापूर हे गाव चिखली तालुक्यातील सर्वात मोठे आहे. मात्र या गावच्या पाणी समस्येचा विषय वेळोवेळी समोर येत आहे. पाईप लाईन लिकेजमुळे गावकऱ्यांना धरणांमध्ये पाणी असताना सुद्धा पाणी वेळेवर मिळत नाही. कुचकामी झालेल्या नळयोजनेमुळे गावकऱ्यांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. गावातील नागरिकांमधून कुचकामी दर्जाच्या नळयोजनेबाबत रोष व्यक्त होत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गावात पाणी आले नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

नुकत्याच सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

अमडापूर या गावाकऱ्यांची कायम पाणी समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून ८ कोटी रुपये खर्च करून गावापासून ३ ते ४ कि.मी. अंतर असलेल्या ब्राम्हणवाडा धरणावरून अमडापूरसाठी नळयोजना कार्यन्वित केली आहे. ही नळयोजना झाल्यावर गावकऱ्यांना या नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता आपली पाणी समस्या कायमची सुटली आहे, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र ही नळ योजना कुचकामी ठरत आहे. एका महिन्यात ३ ते ४ वेळा फूटतूट सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांना कधी आठ दिवस तर कधी बारा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी या नळयोजनेविषयी चार प्रश्न बियाणे महामंडळ संचालक वल्लभराव देशमुख यांनी मांडले. कुचकामी झालेल्या नळयोजनेबाबतचा प्रश्न सोडवा व गावकऱ्यांना दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली आहे.