शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

रानभाज्या खा अन् निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांमधील डोंगरमाथ्यावर विशेष अशा रानभाज्या आढळून येतात. त्यामध्ये कर्टुले, फांदाची भाजी, तरोटा, तांदुळजा ...

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांमधील डोंगरमाथ्यावर विशेष अशा रानभाज्या आढळून येतात. त्यामध्ये कर्टुले, फांदाची भाजी, तरोटा, तांदुळजा यांचा समावेश आहे, तर यापैकी नव्वद टक्के रानभाज्या या कोकण, ठाणे, नंदुरबार भागात आढळून येतात. या भाज्यांमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असून, त्या आहारात असल्याने शरीराला आवश्यक ते घटक मिळतात तर सोबतच शरीरातील विषारी घटक नष्ट करून शरीराला वर्षभर पुरतील एवढे पोषक घटक देतात. तेव्हा श्रावणमासात रानभाज्यांचे सेवन अधिक पौष्टिक आणि उपयुक्त असल्याची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.

या रानभाज्यांची ठेवा माहिती

अशा बहुतांश रानभाज्या आहेत की, त्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत. त्यामध्ये कुरडी, मायाळू, शेवळे, शेवग्याची पाने, टाकळा, तरोटा, पोथीची पाने, कर्टुले, अंबाडी यासोबतच काही कंद आहेत की, ज्यामध्ये करांदे, काटे कंदर, सुरन, अळुज्या मुंडल्या ही कंदमुळेही आहारात असल्याने पौष्टिकत्व मिळते अशी माहिती आहार तज्ज्ञांनी दिली आहे.

यामुळे दिसेनात रानभाज्या

वाढत्या शहरीकरणासोबतच गावाकडून शहराकडे येण्याची ओढ, पिढीबदल आणि रानभाज्यांबद्दल आताच्या तरुण पिढीला नसलेली माहिती या अशा अनेक कारणांमुळे सध्या रानभाज्या दिसेनाशा झाल्या असल्याची माहिती आहे.

श्रावणमासात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून आहारात असाव्यात. लहान बालके आणि वयोवृद्धांना अशा रानभाज्यांचा आहार दिल्यास त्यांना अधिकचे व्हिटॅमिन मिळते. तेव्हा रानभाज्या खाणे शरीरासाठी फायद्याचेच आहे.

-डॉ. वैशाली पडघान, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ