शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रानभाज्या खा अन् निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांमधील डोंगरमाथ्यावर विशेष अशा रानभाज्या आढळून येतात. त्यामध्ये कर्टुले, फांदाची भाजी, तरोटा, तांदुळजा ...

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांमधील डोंगरमाथ्यावर विशेष अशा रानभाज्या आढळून येतात. त्यामध्ये कर्टुले, फांदाची भाजी, तरोटा, तांदुळजा यांचा समावेश आहे, तर यापैकी नव्वद टक्के रानभाज्या या कोकण, ठाणे, नंदुरबार भागात आढळून येतात. या भाज्यांमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असून, त्या आहारात असल्याने शरीराला आवश्यक ते घटक मिळतात तर सोबतच शरीरातील विषारी घटक नष्ट करून शरीराला वर्षभर पुरतील एवढे पोषक घटक देतात. तेव्हा श्रावणमासात रानभाज्यांचे सेवन अधिक पौष्टिक आणि उपयुक्त असल्याची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.

या रानभाज्यांची ठेवा माहिती

अशा बहुतांश रानभाज्या आहेत की, त्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत. त्यामध्ये कुरडी, मायाळू, शेवळे, शेवग्याची पाने, टाकळा, तरोटा, पोथीची पाने, कर्टुले, अंबाडी यासोबतच काही कंद आहेत की, ज्यामध्ये करांदे, काटे कंदर, सुरन, अळुज्या मुंडल्या ही कंदमुळेही आहारात असल्याने पौष्टिकत्व मिळते अशी माहिती आहार तज्ज्ञांनी दिली आहे.

यामुळे दिसेनात रानभाज्या

वाढत्या शहरीकरणासोबतच गावाकडून शहराकडे येण्याची ओढ, पिढीबदल आणि रानभाज्यांबद्दल आताच्या तरुण पिढीला नसलेली माहिती या अशा अनेक कारणांमुळे सध्या रानभाज्या दिसेनाशा झाल्या असल्याची माहिती आहे.

श्रावणमासात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून आहारात असाव्यात. लहान बालके आणि वयोवृद्धांना अशा रानभाज्यांचा आहार दिल्यास त्यांना अधिकचे व्हिटॅमिन मिळते. तेव्हा रानभाज्या खाणे शरीरासाठी फायद्याचेच आहे.

-डॉ. वैशाली पडघान, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ