शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:41 IST

मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’

ठळक मुद्देगणरायाला दिला निरोप : सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’ च्या जयघोषात पुढच्या वर्षी येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी (दि.५) निरोप दिला. विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या.विघ्नहर्ता व मांगल्याच्या देवताच्या उत्सवाची परिसरासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांत ख्याती आहे. त्यात शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शानच आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. २५ आॅगस्ट रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे दिवस नवचैतन्याचेच असतात. त्यामुळेच हे १२ दिवस भुर्रकन निघून गेले व अखेर दिवस उजाडला तो लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा. मंगळवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे चित्र होते. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्शात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी नदी व तलावांवर जात असल्याचे चित्र होते. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत गात तरूणाई गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया... ’चा जयघोष करीत जात असल्याचे दिसून आले. मागल्यांचे देवता गणपती यंदा १२ दिवस आपल्या घरात विराजमान असल्याने त्यांना सहाजीकच भारी मनाने निरोप देण्यात आला. मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही बाप्पांना देण्यात आले.प्रथमच डिजेविना विसर्जनशासनाने डिजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी साथ देत डिजेचा वापर टाळीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले.मंगळवारी सर्वाधिक विसर्जनव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार २ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन ९ तारखेला होणार असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र मंगळवारी (दि.५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी ४८ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या तारखांना घेऊन पोलीस विभागाकडून शेवटचा दिवस कोणता हे कळले नाही. तर रामनगर पोलिसांकडून ठरवून दिलेल्या तारखांबाबत संभ्रम होता.विसर्जनस्थळांवर गर्दीशहरातील पांगोली नदी छोटा गोंदिया- खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यामुळे या विसर्जन स्थळांवर एकच गर्दी दिसून आली. शहरात हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींची स्थापना केली जात असल्याने त्यात सार्वजनिक मंडळांची भर पडत असल्याने विसर्जन स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली.शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तविसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाºयांची ड्यूटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्या सोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय पेट्रोलींग पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते.