शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

एसटीवर लागणार आता ई-टॅग प्रणाली!

By admin | Updated: February 22, 2017 02:29 IST

टोल नाक्याला बाय बाय; प्रवाशांचा वाचणार वेळ

सिध्दार्थ आराख खामगाव, दि. २१- महामार्गावर धावणार्‍या एसटीला जागोजागी असलेल्या टोल नाक्यावर ब्रेक लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जायचा. यावर उपाय म्हणून एसटीला पासेस देण्यात आल्या; मात्र तरीही पास दाखविण्यापुरती का होईना, वेळेचा अपव्यव होत होताच. आता यावर उपाय म्हणून एसटीला ई-टॅग प्रणाली लावण्यात येणार आहे. या सुविधेमुळे टोल नाक्यावर न थांबता एसटी भरधाव निघून जाणार; मात्र तरीही एसटीकडून टोल वसूल केल्या जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महाराष्ट्रात सध्या प्रवासाचे प्रभावी माध्यम एसटी हेच आहे; पण जागोजागी निर्माण झालेल्या टोल नाक्यामुळे एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस १५ ते २0 मिनिटे सहज जातात. यावर प्रवाशी नेहमीच चिडचिड करतात. याला आता खो बसणार आहे. एसटीच्या नवीन ई-टॅग प्रणालीमुळे टोलनाक्यावर कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होती. यावर उपाय म्हणून एसटीला मासिक पास देण्यात आली होती. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले, तरी वेळ मात्र तेवढाच जात होता. हा वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अतित्वात आणली आहे. ई-टॅग प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर धावणार्‍या बससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले असेल. एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर गेल्यास, आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम भरणा केली जाणार आहे. एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाअधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे. ई-टॅगच्या वाहनासाठी स्वतंत्र लेनटोल नाका आला म्हणजे रांगेत वाहने उभी करणे, एखादे छोटे वाहन मध्येच शिरल्यास होणारी वादावादी त्यातून मार्ग काढून टोल नाक्याच्या वसुली केंद्रापर्यंत पोहोचल्यावर पैसे किंवा पास दाखविणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ई-टॅग लावलेल्या स्टिकरच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे. याशिवाय ई-टॅग प्रणाली लागू झाल्यानंतर एसटीला टोलमध्ये १0 टक्के सूटसुद्धा मिळणार असल्याची माहीती एसटीच्या सूत्रांनी दिली. महामार्गावर धावणार्‍या बसची नोंदएसटी महामंडळाच्या कोणत्या मार्गावर कोणत्या बसगाड्या धावणार आहेत, याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळ करून ते राष्ट्रीय महामार्ग त्या विभागाला देणार आहेत. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडण प्रवासात येणार नाही. याव्यतिरिक्त एखादेवेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्याय म्हणून अतिरिक्त वाहनांची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत.