बुलडाणा : जुलैमधील पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे जिल्ह्यात सरासरी ५0 टक्केच पाऊस पडला आहे. अपुर्या पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. मागील तीन-चार दिवसांपासून काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे; परंतु पाऊस सार्वत्रिक व संततधार नाही. या पावसामुळे दुबार पेरणी करण्यासही शेतकर्यांची हिम्मत होत नसल्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात २९९.२ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना जिल्ह्यात केवळ १५0 मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसाची सरासरी टक्केवारी ५0.१४ आहे. चांगल्या पिकांसाठी तसेच पेरणीसाठी कमीत कमी सरासरी ७0 मि.मी. पावसाची गरज असते. दीड महिन्यापूर्वी मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले होते. तत्परतेने शेतकर्यांनी ८0 टक्के पेरण्या आटोपल्या; मात्र पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. आजरोजी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे; मात्र त्यापूर्वीच अनेक शेतकर्यांनी कोमेजलेल्या पिकांची वखरणी केली होती. ज्यांच्या सिंचनाची सुविधा आहे, त्यांची पिके काही प्रमाणात चांगली आहेत; मात्र येणार्या काळात जमिनीच्या पोटातील पाणी कमी झाल्यास सिंचनासाठी अडचणी येणार आहेत. तर पेरणी न केलेल्या तसेच कोमेजलेल्या पिकांची वखरणी केलेल्या शेतकर्यांची दुबार पेरणीसाठी हिम्मत होत नाही. एकूण यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
अल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट !
By admin | Updated: July 25, 2015 01:26 IST