शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट !

By admin | Updated: July 25, 2015 01:26 IST

बुलडाणा जिल्ह्यात केवळ १५0 मि.मी. सरासरी पाऊस.

बुलडाणा : जुलैमधील पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे जिल्ह्यात सरासरी ५0 टक्केच पाऊस पडला आहे. अपुर्‍या पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. मागील तीन-चार दिवसांपासून काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे; परंतु पाऊस सार्वत्रिक व संततधार नाही. या पावसामुळे दुबार पेरणी करण्यासही शेतकर्‍यांची हिम्मत होत नसल्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात २९९.२ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना जिल्ह्यात केवळ १५0 मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसाची सरासरी टक्केवारी ५0.१४ आहे. चांगल्या पिकांसाठी तसेच पेरणीसाठी कमीत कमी सरासरी ७0 मि.मी. पावसाची गरज असते. दीड महिन्यापूर्वी मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले होते. तत्परतेने शेतकर्‍यांनी ८0 टक्के पेरण्या आटोपल्या; मात्र पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. आजरोजी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे; मात्र त्यापूर्वीच अनेक शेतकर्‍यांनी कोमेजलेल्या पिकांची वखरणी केली होती. ज्यांच्या सिंचनाची सुविधा आहे, त्यांची पिके काही प्रमाणात चांगली आहेत; मात्र येणार्‍या काळात जमिनीच्या पोटातील पाणी कमी झाल्यास सिंचनासाठी अडचणी येणार आहेत. तर पेरणी न केलेल्या तसेच कोमेजलेल्या पिकांची वखरणी केलेल्या शेतकर्‍यांची दुबार पेरणीसाठी हिम्मत होत नाही. एकूण यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.