शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पावसामुळे आंब्यांची आवक घटली

By admin | Updated: July 5, 2016 00:59 IST

गावरान आंब्याचा तुटवडा पडला असून कै-यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यासह जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या अवर्षण परिस्थितीचा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याने तालुक्यात आंब्याची आवक घटली आहे. यामुळे ग्राहकांना कैर्‍या व पिकलेले आंबे खरेदी करण्यासाठी अडीचपटीने पैसे मोजावे लागत आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाळय़ाच्या तोंडावर शहरासह ग्रामीण भागात लोणची घालण्याची लगबग सुरू होते. मात्र यावर्षी तालुक्यात एक महिना उशीरा पाऊस सुरू झाल्याने सद्या लोणचे घालण्याची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात मागील दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे याचा फटका आंबा उत्पादकांना बसल्याने जिल्हय़ासह परिसरात म्हणावे तसे आंबा उत्पादन झाले नाही. यावर्षी पावसाची सुरूवात अतिशय निराशाजनक झाल्याने गावरान आंब्याच्या कैर्‍या दृष्टीस पडल्या नाही. मात्र बाहेरच्या राज्यातून आलेले केसर, दशहरी, आम्रपाली, लंगडा, हापूस, बादाम, लालबाग, राजापुरी दिसला. लोणचे टाकण्यासाठीच्या कैर्‍यांची स्थितिही यापेक्षा वेगळी नाही. पावसाळा सुरू झाल्यामुळे आठवडी बाजारात कैर्‍या खरेदीसाठी महिलांसह ग्रामस्थांची लगबग सुरू झाली आहे. परंतु सद्या गावरान आंब्याच्या कैर्‍या बाजारात उपलब्ध नाही. या आंब्याचा भाव ५0 ते ६0 रूपये किलो आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गावरान कैर्‍या परिसरात कुठेच उपलब्ध नाही. मात्र बाजारात इतर वाणाच्या परंतु आकाराने लहान असलेल्या कैर्‍या काही व्यापार्‍यांनी गावरान म्हणून ८0 रूपये किलो दराने विकतांना दिसत आहे.