शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लाॅकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाच्या काळात गाेरगरीब उपाशी राहू नये, यासाठी १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थाली देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यातील दाेन हजार गरजूंना याचा लाभ हाेणार आहे.

वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच अत्यावश्यक सेवाव्यतिरीक्त इतर सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या काळात गरीब लाेक उपाशी राहू नये यासाठी शासनाने अल्पदरात शिवभाेजन सुरू केले हाेते. तसेच १५ एप्रिलपासून शिवभाेजन थाळी माेफत देण्याची घाेषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रांवरून दरराेज दाेन हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे, गरजूंना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने लाॅकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. याचा सर्वाधिक फटका गाेरगरिबांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पॅकेजची घाेषणा केली आहे.

शिवभाेजनमुळे आधार मिळाला

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. शिवभाेजनामुळे आधार मिळाला आहे. आधी अल्पदरात आणि आता माेफत शिवभाेजन थाली देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा हा निर्णय चांगला आहे. निर्बंधाच्या काळात दिलासा मिळाला.

अजय जतकर, बुलडाणा

शासनाने कडक निर्बंधाच्या काळात शिवभाेजन थाळी माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने, हाॅटेल बंद असल्याने सर्वसामान्यांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे.

राजू झिने, बुलडाणा

शहरातील सर्व हाॅटेल्स बंद असल्याने बाहेरगावातून येणाऱ्यांसाठी शिवभाेजन आधार ठरत आहे. बसस्थानकावरच माेफत मिळत असल्याने गरजू प्रवाशांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.

भगवान शर्मा, बुलडाणा

१५० ते २०० थाळी

जिल्ह्यात १७ केंद्रांच्या माध्यमातून १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थालीचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी दरराेज रांगा लागत आहे.

एका केंद्रावर दरराेज १५० ते २०० थाळ्या वितरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शहर व जिल्ह्याची लाेकसंख्या पाहता दरराेज वितरित हाेणाऱ्या थाळ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.