शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाच्या काळात गाेरगरीब उपाशी राहू नये, यासाठी १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थाली देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यातील दाेन हजार गरजूंना याचा लाभ हाेणार आहे.

वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच अत्यावश्यक सेवाव्यतिरीक्त इतर सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या काळात गरीब लाेक उपाशी राहू नये यासाठी शासनाने अल्पदरात शिवभाेजन सुरू केले हाेते. तसेच १५ एप्रिलपासून शिवभाेजन थाळी माेफत देण्याची घाेषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रांवरून दरराेज दाेन हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे, गरजूंना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने लाॅकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. याचा सर्वाधिक फटका गाेरगरिबांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पॅकेजची घाेषणा केली आहे.

शिवभाेजनमुळे आधार मिळाला

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. शिवभाेजनामुळे आधार मिळाला आहे. आधी अल्पदरात आणि आता माेफत शिवभाेजन थाली देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा हा निर्णय चांगला आहे. निर्बंधाच्या काळात दिलासा मिळाला.

अजय जतकर, बुलडाणा

शासनाने कडक निर्बंधाच्या काळात शिवभाेजन थाळी माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने, हाॅटेल बंद असल्याने सर्वसामान्यांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे.

राजू झिने, बुलडाणा

शहरातील सर्व हाॅटेल्स बंद असल्याने बाहेरगावातून येणाऱ्यांसाठी शिवभाेजन आधार ठरत आहे. बसस्थानकावरच माेफत मिळत असल्याने गरजू प्रवाशांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.

भगवान शर्मा, बुलडाणा

१५० ते २०० थाळी

जिल्ह्यात १७ केंद्रांच्या माध्यमातून १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थालीचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी दरराेज रांगा लागत आहे.

एका केंद्रावर दरराेज १५० ते २०० थाळ्या वितरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शहर व जिल्ह्याची लाेकसंख्या पाहता दरराेज वितरित हाेणाऱ्या थाळ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.