शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके सुुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST

आश्विन सानप किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी ...

आश्विन सानप

किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. कधी पाऊस पडणार, असा प्रश्न या परिसरातील बळीराजांना पडला असून, याकरिता आभाळाकडे आस लावून बसले आहेत.

किनगाव राजा व आजूबाजूला हिवरखेड, विझोरा ,पळसखेड ,पांगरी उगले, शेलगाव राऊत, पिंपळगाव परिसरात यंदा मान्सूनचे आगमन जूनमध्ये न होता तब्बल एक महिना उशिरा जुलैमध्ये झाले होते. तरीही येथील शेतकऱ्यांनी हिमतीने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारीची पेरणी केली. उगवून आलेल्या पिकांच्या वाढीसाठी आपापल्या पद्धतीने स्वतःजवळ असलेल्या ठिबक तसेच तुषार सिंचनाद्वारे विहिरीचे पाणीही दिले होते. दरम्यान, मध्यंतरी १३ जुलै रोजी या भागात दमदार पाऊस पडल्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली होती. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनला शेंगा आल्या आहेत, तर मूग वाधीमध्ये आला आहे. परंतु १६ जुलैपासून पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन तसेच मुगाच्या शेंगा दाण्याने भरण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने विहिरींचेही पाणी आटले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांजवळ सध्या कुठलीच व्यवस्था नाही. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून गमावले जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर दिसत आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

कोरोना महामारीमुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या किनगाव राजा व परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षी तरी चांगला पाऊस पडून चार पैसे मिळेल अशी आशा होती; परंतु गेल्या वीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिंता व भीती निर्माण केली आहे. १७ ऑगस्टनंतर पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाने दांडी मारल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

अत्यल्प पावसात हिमतीने सोयाबीनची पेरणी केली. परंतु उगवून न आल्यामुळे दुबार पेरणी केली. सध्या पीक फुलात आहे; परंतु मागील वीस दिवसांपासून पाऊस न पडल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

गजानन मुंढे, शेतकरी

पळसखेड चक्का

सोयाबीन पिकासह भेंडी लावली आहे. महागडी औषधे आणि रासायनिक खते वापरली आहेत. खूप खर्च झाला आहे; परंतु ऐनवेळी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील माल पावसाअभावी सुकू लागला आहे.

रामेश्वर काकड, शेतकरी, किनगाव राजा