शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पावसाअभावी पिके सुुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST

आश्विन सानप किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी ...

आश्विन सानप

किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. कधी पाऊस पडणार, असा प्रश्न या परिसरातील बळीराजांना पडला असून, याकरिता आभाळाकडे आस लावून बसले आहेत.

किनगाव राजा व आजूबाजूला हिवरखेड, विझोरा ,पळसखेड ,पांगरी उगले, शेलगाव राऊत, पिंपळगाव परिसरात यंदा मान्सूनचे आगमन जूनमध्ये न होता तब्बल एक महिना उशिरा जुलैमध्ये झाले होते. तरीही येथील शेतकऱ्यांनी हिमतीने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारीची पेरणी केली. उगवून आलेल्या पिकांच्या वाढीसाठी आपापल्या पद्धतीने स्वतःजवळ असलेल्या ठिबक तसेच तुषार सिंचनाद्वारे विहिरीचे पाणीही दिले होते. दरम्यान, मध्यंतरी १३ जुलै रोजी या भागात दमदार पाऊस पडल्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली होती. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनला शेंगा आल्या आहेत, तर मूग वाधीमध्ये आला आहे. परंतु १६ जुलैपासून पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन तसेच मुगाच्या शेंगा दाण्याने भरण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने विहिरींचेही पाणी आटले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांजवळ सध्या कुठलीच व्यवस्था नाही. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून गमावले जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर दिसत आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

कोरोना महामारीमुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या किनगाव राजा व परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षी तरी चांगला पाऊस पडून चार पैसे मिळेल अशी आशा होती; परंतु गेल्या वीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिंता व भीती निर्माण केली आहे. १७ ऑगस्टनंतर पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाने दांडी मारल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

अत्यल्प पावसात हिमतीने सोयाबीनची पेरणी केली. परंतु उगवून न आल्यामुळे दुबार पेरणी केली. सध्या पीक फुलात आहे; परंतु मागील वीस दिवसांपासून पाऊस न पडल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

गजानन मुंढे, शेतकरी

पळसखेड चक्का

सोयाबीन पिकासह भेंडी लावली आहे. महागडी औषधे आणि रासायनिक खते वापरली आहेत. खूप खर्च झाला आहे; परंतु ऐनवेळी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील माल पावसाअभावी सुकू लागला आहे.

रामेश्वर काकड, शेतकरी, किनगाव राजा