शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आधार कार्डअभावी कामे खोळंबली

By admin | Updated: May 12, 2015 00:09 IST

मेहकर येथील ३0 टक्के नागरिक आधारकार्ड पासून वंचित.

मेहकर (जि. बुलडाणा) : भारतीय असल्याची ओळख म्हणून शासनाच्यावतीने आधार कार्ड सक्तीचे केले आहे; मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे आजही तालुक्यातील जवळपास ३0 टक्के नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत. आधार कार्डअभावी नागरिकांची विविध कामे खोळंबली आहेत. भारतीय असल्याची ओळख म्हणून व शासकीय कामासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड योजनेला वर्ष उलटत असूनही तालुक्यातील ३0 टक्के नागरिक आजही आधार कार्डपासून वंचित आहेत. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळत नाही. शासनाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र आधार कार्डअभावी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांना बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी, गॅसधारक, सेवानवृत्त कर्मचारी, कार्यरत कर्मचारी, वयोवृद्धांना श्रावणबाळसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. काही नागरिकांनी आधार कार्ड काढले खरे; परंतु त्यांच्याकडूनही प्रत्येकी ६0 ते १00 रुपये वसूल करण्यात आले आहेत. सेतू केंद्रावर पैसे भरूनही काही नागरिकांना आधार कार्ड अद्यापपर्यंत देण्यात आले नाही.