शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

भूजल पातळी वाढल्याने विभाग टँकरमुक्त

By admin | Updated: May 16, 2014 00:06 IST

अमरावती विभागात जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने यावर्षी प्रथमच टँकरचे प्रमाण विभागात घटल्याचे चित्र दिसत आहे.

बुलडाणा : २0१३ या वर्षात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे तुडुंब भरले. सिंचन तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले. परिणामी, अमरावती विभागात जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने यावर्षी प्रथमच टँकरचे प्रमाण विभागात घटल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण अमरावती विभागात सद्यस्थितीत केवळ २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच महिन्यात तब्बल २0१ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सतत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागला. पिण्याच्या पाण्यासाठी जेथे नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत होती, तेथे पिकं जगविणे कठीण झाले होते. पाऊसच नसल्याने शेती पिकाच्या उत्पादनात घट झाली, त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. त्यातून अनेक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका बसला तो बुलडाणा जिल्ह्याला. गतवर्षी अवर्षणाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १४८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला तब्बल १९३ टँकर लावावे लागले होते. तरीही पाण्यासाठी लोकांची ओरड सुरूच होती. ह्यआडातच नाही तर, पोहर्‍यात कोठूनह्ण, अशी अवस्था असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले होते. २0१३ चा ती पाणी टंचाई आजही अंगावर शहारे आणणारी आहे; मात्र या उन्हाळ्यात बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. या चार गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाने १0 टँकर लावले आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील ११ गावांना पाणीटंचाईची झळ बसली. यावर्षी अमरावती जिल्ह्यात जेमतेम ८ गावे पाणीटंचाईसदृश आहेत. येथे पाणी पुरवठय़ासाठी प्रशासनाकडून आठ टँकर लावण्यात आल्याची माहिती आहे. २0१३ मध्ये अमरावती विभागात १७९ गावे पाणी टंचाईच्या विळख्यात होती; मात्न यावर्षी जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने पाणी टंचाईच्या झळा फार कमी गावांना आहेत. मागीलवर्षी अकोला जिल्ह्यात चार, वाशिममध्ये नऊ आणि यवतमाळ जिल्ह्यात सात गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. यावर्षी अकोला व वाशिम जिल्ह्यात एकही गाव पाणीटंचाईने ग्रस्त नसल्याची माहिती आहे. सरत्या पावसाळ्यात निसर्गाची साथ मिळाली. सरासरीपेक्षा अमरावती विभागात दुप्पट पाऊस झाला. या पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये भरमसाठ वाढ झाली. तर पावसाळा संपल्यानंतरही एप्रिल, मेपर्यंत अधूनमधून अवकाळी पाऊस सुरूच आहे. याचाही लाभ बर्‍यापैकी झाल्याने पाणी टंचाईची समस्या दूर झाली व या उन्हाळ्यात तरी बुलडाणा जिल्हा काही अंशी टँकरमुक्त जिल्हा झाला.