शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

अतिवृष्टीमुळे टँकरची संख्या घटली

By admin | Updated: September 24, 2015 01:17 IST

जलसंकट टळले; विहिरींच्या जलपातळीतही वाढ.

बुलडाणा : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांत जिल्ह्यात १६७१.८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे बर्‍याच प्रकल्पांतील जलपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी जलसंकट टळले असून, ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्याही घटली आहे. यंदा अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी व पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरीदेखील बर्‍याच भागात दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८ गावांसाठी ७0 टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. उन्हाळ्यात बर्‍याच गावांना पाणीटंचाई छळ सोसावी लागली होती. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पिकांना तर फटका बसलाच, शिवाय ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट उभे ठाकले. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत जिल्ह्यातील २३ गावांमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. गत आठवड्यात मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत ४८८.८ मि.मी. म्हणजे सरासरी ३७.६ मि.मी. एवढा पाऊस झाला. गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये १,१८३ मि.मी. म्हणजे सरासरी ९१ मि.मी. एवढा पाऊस नोंदविला गेला. पावसाच्या सरासरीत निर्माण झालेली मोठी तफावत या तीन दिवसांत भरून निघाल्यामुळे सर्वच धरणांची जलपातळी वाढली. याशिवाय नदी-नाले ओसंडून वाहिल्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट टळून बर्‍याच गावांतील टँकरची संख्या कमी झाली.