शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे टँकरची संख्या घटली

By admin | Updated: September 24, 2015 01:17 IST

जलसंकट टळले; विहिरींच्या जलपातळीतही वाढ.

बुलडाणा : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांत जिल्ह्यात १६७१.८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे बर्‍याच प्रकल्पांतील जलपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी जलसंकट टळले असून, ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्याही घटली आहे. यंदा अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी व पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरीदेखील बर्‍याच भागात दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८ गावांसाठी ७0 टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. उन्हाळ्यात बर्‍याच गावांना पाणीटंचाई छळ सोसावी लागली होती. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पिकांना तर फटका बसलाच, शिवाय ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट उभे ठाकले. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत जिल्ह्यातील २३ गावांमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. गत आठवड्यात मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत ४८८.८ मि.मी. म्हणजे सरासरी ३७.६ मि.मी. एवढा पाऊस झाला. गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये १,१८३ मि.मी. म्हणजे सरासरी ९१ मि.मी. एवढा पाऊस नोंदविला गेला. पावसाच्या सरासरीत निर्माण झालेली मोठी तफावत या तीन दिवसांत भरून निघाल्यामुळे सर्वच धरणांची जलपातळी वाढली. याशिवाय नदी-नाले ओसंडून वाहिल्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट टळून बर्‍याच गावांतील टँकरची संख्या कमी झाली.