शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

शेतक-यांच्या अतिक्रमणाने ज्ञानगंगा अभयारण्यातील वनसंपदा धोक्यात

By admin | Updated: November 17, 2016 16:11 IST

व-हाडातील वनसंपदा असलेल्या विस्तीर्ण अशा ज्ञानगंगा अभयारण्यात शेतक-यांनी वृक्षतोड करून शेती करण्याला सुरूवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 17 -  व-हाडातील वनसंपदा असलेल्या विस्तीर्ण अशा ज्ञानगंगा अभयारण्यात  शेतक-यांनी वृक्षतोड करून शेती करण्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे जंगलाचा -हास होत आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांचा निवा-याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे.
 
जिल्ह्यातील  २०५ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध औषधी वनस्पतींसह बिबट, अस्वल, हरिण, नीलगायींचे वास्तव्य आहे. या अभयारण्यातील काही गावांचे पुनर्वसन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र काही अडचणींमुळे गावांचे पुनर्वसन रखडले आहे.
 
या गावांमधील नागरिक गावालगतच शेती करतात. मात्र, दिवसेंदिवस त्यांच्या शेतीचा परिसर वाढतच आहे. रात्रीच्या सुमारास काही वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. सदर वृक्षतोड केल्यानंतर त्या ठिकाणी पिकांची पेरणी करण्यात येते. हा प्रकार गत काही वर्षांपासून वाढीस लागला आहे. 
 
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.  वनविभागाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने हा प्रकार अधिकच वाढीस लागला आहे. जंगलांमध्ये शेतक-यांचा वावर वाढल्याने वन्य प्राण्यांवरही याचा विपरित परिणाम होत आहे.
 
अवैध लाकूड व्यावसियाकांचाही हात?
शेतालगच्या वृक्षांची तोड करून लाकडे बुलडाणा किंवा अन्य शहरातील अवैध लाकडांचा व्यवसाय करणा-यांना विकण्यात येतात. त्यामुळे या व्यावसायिकांकडून शेतक-यांना वृक्षतोडीसाठी फूस लावण्यात येत आहे. वृक्षतोड करून व शेतीचा परिसर वाढवून शेतक-यांना फायदा होत असला तरी या व्यावसायिकांचेही चांगलेच फावत आहे.
 
वन विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल
ज्ञानगंगा अभयारण्यात अनेक वर्षांपासून ही गावे आहेत. या गावांमधील शेतकरी त्यांची शेती करतात. मात्र, या ठिकाणी वृक्षतोड करून शेतीचा परिसर वाढविण्यात यत असेल तर निश्चितच वनविभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल. - बी. ए. पोळ, एससीएफ, वनविभाग, बुलडाणा