शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

शेतक-यांच्या अतिक्रमणाने ज्ञानगंगा अभयारण्यातील वनसंपदा धोक्यात

By admin | Updated: November 17, 2016 16:11 IST

व-हाडातील वनसंपदा असलेल्या विस्तीर्ण अशा ज्ञानगंगा अभयारण्यात शेतक-यांनी वृक्षतोड करून शेती करण्याला सुरूवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 17 -  व-हाडातील वनसंपदा असलेल्या विस्तीर्ण अशा ज्ञानगंगा अभयारण्यात  शेतक-यांनी वृक्षतोड करून शेती करण्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे जंगलाचा -हास होत आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांचा निवा-याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे.
 
जिल्ह्यातील  २०५ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध औषधी वनस्पतींसह बिबट, अस्वल, हरिण, नीलगायींचे वास्तव्य आहे. या अभयारण्यातील काही गावांचे पुनर्वसन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र काही अडचणींमुळे गावांचे पुनर्वसन रखडले आहे.
 
या गावांमधील नागरिक गावालगतच शेती करतात. मात्र, दिवसेंदिवस त्यांच्या शेतीचा परिसर वाढतच आहे. रात्रीच्या सुमारास काही वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. सदर वृक्षतोड केल्यानंतर त्या ठिकाणी पिकांची पेरणी करण्यात येते. हा प्रकार गत काही वर्षांपासून वाढीस लागला आहे. 
 
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.  वनविभागाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने हा प्रकार अधिकच वाढीस लागला आहे. जंगलांमध्ये शेतक-यांचा वावर वाढल्याने वन्य प्राण्यांवरही याचा विपरित परिणाम होत आहे.
 
अवैध लाकूड व्यावसियाकांचाही हात?
शेतालगच्या वृक्षांची तोड करून लाकडे बुलडाणा किंवा अन्य शहरातील अवैध लाकडांचा व्यवसाय करणा-यांना विकण्यात येतात. त्यामुळे या व्यावसायिकांकडून शेतक-यांना वृक्षतोडीसाठी फूस लावण्यात येत आहे. वृक्षतोड करून व शेतीचा परिसर वाढवून शेतक-यांना फायदा होत असला तरी या व्यावसायिकांचेही चांगलेच फावत आहे.
 
वन विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल
ज्ञानगंगा अभयारण्यात अनेक वर्षांपासून ही गावे आहेत. या गावांमधील शेतकरी त्यांची शेती करतात. मात्र, या ठिकाणी वृक्षतोड करून शेतीचा परिसर वाढविण्यात यत असेल तर निश्चितच वनविभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल. - बी. ए. पोळ, एससीएफ, वनविभाग, बुलडाणा