चिखली : आपल्या अधिकाराचा गैरवापर करून वरिष्ठांची दिशाभूल करण्यासोबतच राजकीय व आर्थिक सुबत्ता असलेल्यांशी संगनमत करून बनावट व खोटी माहिती आणि दस्तऐवजांच्या आधारे फेरफार मंजूर केल्याप्रकरणी चिखलीचे मंडळ अधिकारी रवींद्र काकडे, तलाठी सौंदाजी कटक व विजय बावस्कर या तिघांविरुद्ध चिखली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १५६ (३) अन्वये तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रकारामुळे येथील मंडळ अधिकारी कार्यालयातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. चिखली येथील मंडळ अधिकारी रवींद्र काकडे हे गत चार ते पाच वर्षांपासून कार्यालयात कार्यरत आहेत; मात्र त्यांच्या कारकीर्दीत सर्वसामान्य जनतेच्या असंख्य तक्रारी होत असतानाही ह्यराजकीय वरदहस्तह्ण लाभल्याने त्यांच्या सर्कलमधील सर्व तलाठय़ांवर दबावतंत्राचा वापर करून मनमानी कारभार चालला. चुकीचे व बेकायदेशीर फेरफार संबंधित तलाठय़ांना नोंदवायला लावून व ते रुजू करून, त्याचे दस्त संबंधित लोकांना पुरविणो व सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करणे यामुळे सर्वत्र कुपरिचित होते.
बनावट दस्तावेजाच्या आधारे फेरफार रुजू करणे भोवले!
By admin | Updated: December 17, 2015 02:37 IST