शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

रोहित्र जळाल्याने सात गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: October 12, 2015 01:21 IST

नांदुरा तालुक्यातील सात गावातील नागरिक पाणी पुरवठय़ाअभावी १५ दिवसांपासून त्रस्त.

नांदुरा (जि. बुलडाणा) : महावितरण कंपनीच्या शेंबा येथील कार्यालय अंतर्गत येणार्‍या कंडारी येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील सात गावांचा पाणीपुरवठा १५ दिवसापासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कंडारी प्रकल्पातील विहिरीवरून १४ हजार लोकसंख्येच्या सात गावांना पाणीपुरवठा होतो. तथापि, रोहित्र जळाल्याने तरवाडी, पोटा, खैरा, जवळा बाजार, बेलुरा, फुली, पिंप्री आढाव या गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक शिवारातील विहिरींवरून पाणी आणत आहेत. महावितरणकडे तोंडी तक्रारी झाल्या असून, तरवाडी ग्रामपंचायतीने याबाबत लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे. दरम्यान, नवीन रोहित्र मलकापूर कार्यालयातून दोन दिवसांत येत आहे; ते त्वरेने बसविण्यात येईल, असे कनिष्ठ अभियंता आर. टी. वानखडेंनी सांगितले.