शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

उपेक्षितांचा ‘द्रोणाचार्य’

By admin | Updated: September 5, 2014 00:22 IST

खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांचे समाज घडविण्याचे व्रत.

अनिल गवई / खामगावशिक्षण क्षेत्रात गुणवंत.. हुशार.. विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेची धडपड आहे. इतकेच नव्हे तर दहावी-बारावी आणि इतर शैक्षणिक सत्राचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गाचाच या अशी ह्यचोरीह्णही केली जात असताना, समाजातील उपेक्षित तो आ पला, या एकमेव ध्येयाने खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांनी समाज घडविण्याचे व्रत हाती घेतले आहे. आपल्या सृजनशील कृतीतून ह्यद बेस्ट आऊट ऑफ वेस्टह्ण या तत्वानुसार एक दोन नव्हे तर दीड हजारावर नापास मुलांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन फुलविले आहे.परीक्षेत नापास झालेल्यांसोबतच समाजातील दुर्लक्षित व अवहेलना झालेल्या विद्यार्थ्यांंच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पेसोडे गुरूजी यांनी खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे १ जुलै २000 रोजी जागृती विद्यालयाची स्थापना केली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत नापास झालेल्यांना शैक्षणिक प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. ह्यतुला काय येत नाही, या पेक्षा तू काय करू शकतोह्ण, असा आ त्मविश्‍वास निर्माण केला. त्यामुळे नापासांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी आज सन्मानाने जीवन जगत आहेत. गुरूजींच्या सृजनशील विचारांमुळे अनेकांना पुढे शिकता आले. काही जणांना नोकरी लागली. काही उद्योजक..व्यापारी अन् काही शिक्षकही झालेत. तर काही गुरूजींच्या शाळेत विद्या र्थ्यांंंना घडविण्याचा वसा घेतला आहे. जागृतीच्या स्थापनेपासून आजपर्यंंंत दीड हजाराच्यावर नापास विद्यार्थ्यांंंच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आले आहेत. निकालाबाबत बदललेल्या धोरणामुळे या नापासांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंंची संख्या रोडावली असली तरी प्रत्येक नापास विद्यार्थ्यांंंच्या आयुष्यात ह्यहात आकाशाला जरूर टेकवा, पण पायाखालील जमीन न सोडताह्ण हा मंत्र रूजविण्यासाठी पेसोडे गुरूजी यांचे सुरू असलेले अविरत प्रयत्न ह्यतिमिरातून तेजाकडेह्ण नेणारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना दज्रेदार शिक्षण देण्यासाठी जागृती ज्ञानपीठाची वाटचाल असून शेलोडी,टेभूर्णा, आंबेटाकळी येथील शाळांमध्ये १२00 च्यावर विद्यार्थी शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे गिरवित आहेत. इंग्रजी शिक्षणासोबतच संस्कृती जतन करण्यासाठी जागृती अग्रेसर आहे. आता पेसोडे गुरूजींची अध्यात्माकडे वाटचाल असून भागवत धर्माचा प्रचार-प्रचारासाठी ते अधिक वेळ देत आहेत.र्जमनी, युरोप खंडा तील काही देशांमध्ये श्रीमद् भागवत आणि राम कथांवर त्यांची २00 च्यावर प्रवचन झाली आहेत. अरुणाचल प्रदेशात तब्बल २0 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी शैक्षणीक क्षेत्रात घालविला आहे.