शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खामगावात ७५० झाडे जगविण्यासाठी अनोखी धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:45 IST

निसर्गातून घेतलेले आॅक्सीजन म्हणजे ओ-२ निसर्गाला परत करण्यासाठी खामगाव शहरात झाडे लावण्याची मोहिम उघडण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर आणि परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने मिशन-ओ-च्या माध्यमातून शहराच्या विविध भागात आॅगस्ट ते आॅक्टोंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत लोकसहभागातून ७५० च्यावर वृक्ष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने घाटपुरी रोड ते जगदंबा मंदिर परिसराला प्राधान्य देण्यात आले. लावण्यात आलेली जवळपास सर्वच झाडे पूर्णपणे जगली असल्याने मिशन ओ-२ आणि वृक्षप्रेमींचे प्रयत्न फळास आल्याचे दिसून येते.निसर्गातून घेतलेले आॅक्सीजन म्हणजे ओ-२ निसर्गाला परत करण्यासाठी खामगाव शहरात झाडे लावण्याची मोहिम उघडण्यात आली. या मोहिमेला पर्यावरण प्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृतीशील सहभागामुळे शहराच्या विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये किसन नगर, वरणगावकर विद्यालय, नॅशनल हायस्कूल समोरील भाग, घाटपुरी रोड आणि खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सजनपुरी समोरील काही भागांना प्राधान्य देण्यात आले. मिशन ओ-२ च्या सकारात्मक प्रयत्नांना शहरातील काही सामाजिक पदाधिकाऱ्यांनी तसेच दानदात्यांनी हातभार लावला. सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडे देण्यात आली. तर दानशुरांनी ट्री-गार्डसाठी मदत केली. आता मिशन ओ-२ पदाधिकारी लावलेली सर्वच झाडे जगविण्यासाठी प्रकल्प संचालक डॉ. के.एस.थानवी यांच्या पुढाकारात परिश्रम घेत आहेत. बहुतांश झाडे जगल्याचे सामाजिक वनीकरणासह मिशन-ओ-२ च्या सदस्यांना समाधान असल्याचे दिसून येते. दरम्यान, खामगावमध्ये वृक्षसंवर्धनाला यामुळे आता प्राधान्य मिळत असून येत्या काळात त्याचे दृश्य परिणामही समोर येतील.

टॅग्स :khamgaonखामगाव