शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

५६ टक्के बेघरांच्या घरांचे स्वप्न साकारले!

By admin | Updated: August 28, 2016 23:34 IST

बुलडाणा जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेअंतर्गत चार वर्षात होते १४ हजार ४९२ घरांचे उद्दिष्ट.

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. २८: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत इंदिरा आवास योजनेमध्ये जिल्ह्यात गेल्या चार वर्षात १४ हजार ४९२ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी इंदिरा आवास योजनेमुळे जिल्ह्यात ८ हजार १९0 घरकुले पूर्ण झाल्यामुळे गेल्या चार वर्षात केवळ ५६.५१ टक्केच बेघरांच्या घरांचे स्वप्न साकारल्याचे दिसून येत आहे. इंदिरा आवास ही केंद्र पुरस्कृत योजना सन १९९५-९६ पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागा तील दारिद्रय़रेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा इंदिरा आवास योजनेचा उद्देश आहे. या योजनेतून घरकुल बांधकामासाठी लाभार्थींंची निवड ग्राम पंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते. इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय़रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी देण्यात आलेल्या आहेत. सन २00२ मध्ये झालेल्या दारिद्रय़रेषेच्या सर्व्हेनुसार सन २00७-0८ ते सन २0१४-१५ मध्ये लाभार्थींंची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी सन २0१२-१३ ते सन २0१५-१६ या चार वर्षांंसाठी ८ हजार १९0 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ९३0 घरकुल मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षात ८ हजार १९0 घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यासाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ ५६.५१ टक्केच बेघरांच्या घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ हजार ४९६ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आता प्रधानमंत्री आवास योजना २0१६-१७ पासून इंदिरा आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणून ओळखली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना २0१६-१७ मध्ये राबविली जाणार आहे. त्यामध्ये घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात १.२0 लाख रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय्य राज्यस्तरावरील बँक खा त्यातून लाभार्थींंच्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अं तर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, २0११ मधील माहिती लाभार्थींंच्या निवडीकरिता वापरण्या त येणार आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यासाठी सन २0१६-१७ या वर्षामध्ये ५ हजार ४९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ६ हजार ७४0 कुटुंबांना घरांची प्रतीक्षाबुलडाणा जिल्ह्यात सन २0१२-१३ पासून सन २0१५-१६ पर्यंंत १४ हजार ९३0 घरकुले मंजूर करण्यात आली होती; परंतु त्यापैकी केवळ ८ हजार १९0 घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंजूर असलेल्या ६ हजार ७४0 बेघरांना घरकुलांची प्रतीक्षा आहे.